AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: अजिंक्य रहाणे, पुजाराचं पुढे काय होणार? दोघांचाही पुढचा प्रवास खडतर

“करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही. या तिघांबरोबर सध्या असचं घडतय”

IND vs SA: अजिंक्य रहाणे, पुजाराचं पुढे काय होणार? दोघांचाही पुढचा प्रवास खडतर
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 4:01 PM
Share

जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधीपासूनच अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar pujara) फॉर्मबद्दल चर्चा सुरु होती. अजिंक्य रहाणेची कसोटी संघात निवड होईल का? असा अनेकांना प्रश्न पडला होता. पण निवड समितीने अनुभवाला प्राधान्य देत अजिंक्यची संघात निवड केली. पण अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोघांनाही निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या विश्वासाला न्याय देता आलेला नाही. पहिल्या कसोटी प्रमाणे दुसऱ्या कसोटीतही त्यांनी निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. (India vs South Africa Ajinnkya Rahane & cheteshwar pujaras Future Journey difficult)

महत्त्वाचं म्हणजे संघाला गरज असताना मोक्याच्या क्षणी त्यांना उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी होती. पण दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये ते फेल गेले आहेत. पहिल्या कसोटीत अजिंक्यने दोन्ही डावात मिळून 68 तर पुजाराने फक्त 16 धावा केल्या होत्या. आज जोहान्सबर्ग कसोटीत मयंक बाद झाल्यानंतर पुजारा अवघ्या तीन धावांवर बाद झाला तर रहाणेला भोपाळाही फोडता आला नाही. दोघांना डुआन ओलिवरने आल्यापावली पॅव्हेलियनमध्ये धाडले. काल हेड कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत दोघांची पाठराखण केली होती.

राहुल द्रविड काय म्हणाले होते? “करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही. या तिघांबरोबर सध्या असचं घडतय” असं राहुल द्रविड रविवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. “एक चांगली गोष्ट आहे, ते चांगले टचमध्ये दिसतायत. चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये कसं बदलायचं, हे त्यांना माहित आहे. काळजी हा शब्द मला योग्य वाटत नाही. जेवढं शक्य आहे, तेवढं ते चांगल करतायत” असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.

आता फक्त दुसऱ्या डावात संधी? अजिंक्य आणि पुजारा दोघे दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरले आहेत. आता दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ आली, तरच त्यांना काहीतरी करुन दाखवण्याची संधी आहे. दुसऱ्या डावातही खराब फॉर्म कायम राहिला, तर तिसऱ्या कसोटीत पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे आणि इथून पुढचा मार्गही खडतर असेल. कारण या दोघांना संघात घेऊ नका, अशी अनेकजण आधीपासून मागणी करत आहेत. या दोघांऐवजी उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्याची मागणी होत आहे. या दौऱ्याआधी रहाणेने दक्षिण आफ्रिकेत 53 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोन दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळले आहेत. दोन अर्धशतकासह 266 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या: 

उभ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची अखेर बदली पोलिसांना शिवीगाळ करणं भोवलं, भंडाऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, किती तारखेपर्यंत बंद राहणार शाळा? वाचा सविस्तर

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.