AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: रोहित शर्माशिवाय टीम इंडियाचं जिंकणं मुश्किल का? ते आकड्यांवरुन समजून घ्या….

IND vs SA: पहिल्या T 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात विकेट राखून पराभव केला. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 1-0 ने आघाडीवर आहे.

IND vs SA: रोहित शर्माशिवाय टीम इंडियाचं जिंकणं मुश्किल का? ते आकड्यांवरुन समजून घ्या....
Rohit sharma-Virat kohli Image Credit source: AFP
| Updated on: Jun 10, 2022 | 1:30 PM
Share

मुंबई: पहिल्या T 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात विकेट राखून पराभव केला. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 1-0 ने आघाडीवर आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत भारतीय संघाचं नेतृत्व करत होता. पण पंतला कॅप्टन म्हणून पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. भारताने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला 212 धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेने पाच चेंडू बाकी असताना, हे लक्ष्य पार केलं. रोहितच्या अनुपस्थितीत भारताला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघ यावर्षी 2022 मध्ये रोहितच्या अनुपस्थितीत एकही सामना जिंकू शकलेला नाही.

भारत यावर्षी 17 सामने खेळला

भारत यावर्षात एकूण 17 सामने खेळला. रोहितने 11 मॅचमध्ये कॅप्टनशिप केली. हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. विराट कोहली, राहुल आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली 6 सामने खेळले गेले. सर्व सामन्यात भारताचा पराभव झाला. रोहित शर्माने यावर्षी 3 वनडे, 6 टी 20 आणि 2 कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं. यावर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 मध्ये 3-0 ने विजय मिळवला. त्यानंतर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी 20 आणि दोन कसोटी सामन्यात क्लीन स्वीप विजय मिळवला.

कोहली, राहुल आणि पंत फ्लॉप शो

विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात पराभव झाला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारत एक कसोटी आणि 3 वनडे सामन्यात पराभव झाला. कोहली आणि राहुलच्या अपयशानंतर ऋषभ पंतकडे दिल्लीत अपयशाचा हा सिलसिला मोडण्याची संधी होती. पण त्यालाही ती संधी साधता आली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात ईशान किशनने सर्वाधिक 76 धावा केल्या. कॅप्टन पंतने 29 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वॅन डार डुसेने नाबाद 75 आणि डेविड मिलरने नाबाद 64 धावा फटकावल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 64 चेंडूत नाबाद 131 धावांची विजयी भागीदारी केली.

Follow Us
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....