AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st T20: रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

IND vs SA 1st T20: पहिल्या टी 20 साठी कशी आहे प्लेइंग 11? टीम इंडियात काय बदल आहेत?

IND vs SA 1st T20: रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11
टीम इंडियाImage Credit source: social
| Updated on: Sep 28, 2022 | 6:42 PM
Share

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून 3 T20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर आज पहिली मॅच होत आहे. पुढच्या महिन्यापासून ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. त्याआधी तयारीच्या दृष्टीने दोन्ही टीम्ससाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. मागच्याच आठवड्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीज संपली. या मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला होता.

टॉस कुणी जिंकला?

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिकेची टीम प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. या मॅचसाठी युजवेंद्र चहलला बाहेर बसवण्यात आलं आहे. त्याच्याजागी रविचंद्रन अश्विनला संधी दिली आहे. जसप्रीत बुमराहला सुद्धा आजच्या सामन्यासाठी संधी दिलेली नाही. त्याजागी दीपक चाहरचा टीममध्ये समावेश केला.

चुका सुधारण्याची संधी 

आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियासमोर अजूनही काही प्रश्न आहेत. खासकरुन गोलंदाजी. आशिया कपमध्ये गोलंदाजीमुळे टीम इंडियाच्या अभियानाला ब्रेक लागला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजमध्येही गोलंदाजीत फार सुधारणा झाली नाही.

उलट डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. भुवनेश्वर कुमार सारख्या सिनियर बॉलरकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण याच गोलंदाजाने अखेरच्या ओव्हर्समध्ये सर्वात जास्त धावा दिल्या.

गोलंदाजी आणि फिल्डिंग मुख्य चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये या चुका दुरुस्त करण्याची चांगली संधी आहे. टीम इंडियाला अजूनपर्यंत मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज जिंकता आलेली नाही. यावेळी हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असेल.

आजच्या सामन्यासाठी अशी आहे प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चाहर, अर्शदीप सिंह,

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.