Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं

| Updated on: Jan 01, 2022 | 7:38 PM

भारताच्या पेस बॅट्रीने दोन्ही डावात मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 18 विकेट घेतल्या व त्यांचं कंबरडं मोडून ठेवलं. अलीकडच्या काही वर्षात परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाज प्रभावी ठरत आहेत.

Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ही प्रमुख तीन कारणं
Follow us on

नवी दिल्ली: सेंच्युरियन कसोटीत भारताने ऐतिहासक कसोटी विजय मिळवला. या विजयामध्ये भारतीय गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. भारताच्या पेस बॅट्रीने दोन्ही डावात मिळून दक्षिण आफ्रिकेच्या 18 विकेट घेतल्या व त्यांचं कंबरडं मोडून ठेवलं. अलीकडच्या काही वर्षात परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाज प्रभावी ठरत आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असो, तिथे भारताला या वेगवान गोलंदाजांच्या बळावरच मालिका विजय साध्य करता आला. (India vs South Africa Why indian bowlers are effective on foreign soil these are three reasons)

IPL चं श्रेय कितपत?

भारतात आज चांगल्या दर्जाचे वेगवान गोलंदाज तयार होत आहेत, आशिष नेहरा त्याचे श्रेय आयपीएलला देतो. “आताचे गोलंदाज पाहून मला आनंद होतो. आधी आयपीएल नव्हतं व देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरच अंतर असायचं. क्रिकेटपटूना खेळण्यासाठी कमी सामने मिळायचे. आयपीएलने भारतीय क्रिकेटला बऱ्याच प्रमाणात चांगल्या पद्धतीने बदलून टाकलं आहे. संघात आता युवा गोलंदाजांसोबत इशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारसारखे गोलंदाज आहेत” असं आशिष नेहरा म्हणतो.

वेगवान गोलंदाजीसाठी शरीराची साथ लागते

“वेगवान गोलंदाजीमध्ये भारताकडे आज पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत. बदललेल्या परिस्थितीमागे ही एक महत्त्वाची बाब आहे. वेगवान गोलंदाजीसाठी शरीराची साथ लागते. खेळाडूंना दुखापती होताना आपण पाहिल्या आहेत. आधी संघाकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसायचा. पण आता 50 ते 100 सामने खेळलेल्या गोलंदाजाची जागा घेणारा दुसरा गोलंदाज उपलब्ध आहे” असे नेहराने क्रिकबझशी बोलताना सांगितले.

दौऱ्यामध्ये काय बदल झाला?

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय क्रिकेटस परदेशातील वातावरणाशी सहज जुळवून घेतात. “2018 पासून भारतीय संघाने दोनवेळा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. यापूर्वी चार ते पाच वर्षातून एकदा परदेश दौरे व्हायचे. परदेश दौऱ्यामधील अंतर कमी झालय, त्याचा भारतीय क्रिकेटपटूंना फायदा होतो. गोलंदाज परदेशी वातावरणाशी चांगल्या पद्धतीन जुळवून घेतात” असे नेहराने सांगितले.

संबंधित बातम्या:

Pimpri chinchawd crime | पिंपरीत पाण्याच्या टँकर खाली चिरडल्याने दोन वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू
साडे दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले?, आगार प्रमुखांकडून रुजू करुन घेण्यास नकार!
Mumbai corona update : आज मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण, संकट अधिक गडद

(India vs South Africa Why indian bowlers are effective on foreign soil these are three reasons)