मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये दुसरा एलिमिनेटर सामना होणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ बाजी मारणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने जागा मिळवली आहे. आज होणाऱ्या सामन्यात दुसरा संघ कोणता असणार हे स्पष्ट होणार आहे. तिन्ही संघानी विजेतेपदावर नाव कोरलं आहे.
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये एकूण 3 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 16 व्या मोसमातील साखळी फेरीत एकूण 2 वेळा आमनेसामने हे दोन्ही संघ आले आहेत. मुंबईने या 3 पैकी 2 मॅचमध्ये गुजरातचा सुपडा साफ केलाय. तर गुजरातनेही एकदा विजय मिळवलाय. आजच्या सामन्यामध्ये पलटणच्या या त्रिमुर्तींवर मोठी जबाबदारी असणार आहे.
मुंबईची गोलंदाजी कमकुवत असल्यामुळे त्यांना मोठी चिंता होती. मात्र मागील दोन तीन सामन्यांमध्ये पलटणच्या पियुष चावला 21 विकेट्स, जेसन बेहरेनडॉर्फ 14 विकेट्स आणि आकाश मधवाल 13 विकेट्स यांच्यावर मोठी भिस्त असणार आहे. गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल 722 धावांसह फॉर्ममध्ये आहे. गुजरातसाठी हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर यांचा अजुनही सूर गवसलेला दिसून आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांना आपल्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दासून शनाका, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, पियुष चावला, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल
आता बाकी असलेल्या तीन संघांनीही विजेतेपदावर नाव कोरलेलं आहे. गतवर्षी गुजरात टायटन्स चॅम्पिअन झाले होते. जर त्यांनी मुंबई आणि सीएसकेला पराभूत केलं तर दुसऱ्यांदा तो ट्रॉफी जिंकणार आहेत. मुंबईने हीच किमया साधली तर तो एकूण सहावेळा चॅम्पिअन ट्रॉफी जिंकतील. सीएसके तर आता फक्त एक पाऊस दूर असून ते पाचव्यांदा जिंकतील.