AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs GT | सामन्याच्या काही मिनिटांआधी गुजरात टायटन्स टीमचा कर्णधार पुन्हा बदलला

पंजाब किंग्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघाचा हा या मोसमातील एकूण चौथा सामना आहे. मात्र त्याआधी गुजरात टायटन्स टीमने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आहे. जाणून घ्या आता गुजरातचा कर्णधार कोण?

PBKS vs GT | सामन्याच्या काही मिनिटांआधी गुजरात टायटन्स टीमचा कर्णधार पुन्हा बदलला
| Updated on: Apr 13, 2023 | 7:47 PM
Share

मोहाली | आयपीएल 16 व्या मोसमातील 18 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. गुजरात किंग्सने टॉस जिंकला आहे. गुजरातने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या मोसमात पंजाब आणि गुजरात या दोन्ही संघांनी 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवलाय. तर दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना गमावला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून पुन्हा विजयी मार्गावर पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा आहे. त्यामुळे दोन्ही टीमकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या सामन्यासाठी गुजरात टीमने पुन्हा एकदा आपला कर्णधार बदलला आहे.

गुजरातची कॅप्टन्सी कुणाकडे?

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पंड्या याने गुजरात टायटन्स टीममध्ये कमबॅक केलं आहे. हार्दिकने कमबॅकसह गुजरातच्या नेतृत्वाची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राशिद खान याला कॅप्टन करण्यात आलं होतं. तेव्हा हार्दिकची तब्येत चांगली नसल्याने हार्दिक सामना खेळला नव्हता. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी ही राशिद खान याला दिली होती. मात्र आता पंड्याला बरं वाटत असल्याने त्याने कमबॅक केलं आणि कॅप्टन्सीची सर्व सूत्र हाती घेतलीत.

केकेआरचा थरारक विजय

गुजरातला कोलकाता विरुद्धच्या सामन्यात घरच्या मैदानात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देऊनही पराभव स्विकारावा लागला होता. गुजरातने पहिले बॅटिंग करताना 204 धावा करत केकेआरला 205 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने या विजयी आव्हानाचं उत्तमरित्या पाठलाग केला होता. केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावांची गरज होती. त्यामुळे केकेआरचा पराभव निश्चित मानला जात होता.

गुजरातकडून शेवटची ओव्हर यश दयाल टाकत होता. तर केकेआरकडून उमेश यादव आणि रिंकू सिंह मैदानात होते. उमेशने पहिल्या बॉलवर एक धावा काढली. त्यानंतर रिंकू स्ट्राईकवर आला. त्यानंतर जे झालं ते उभ्या क्रिकेट विश्वाने पाहिलं. रिंकूने 5 बॉलवर 5 सिक्स मारत अविश्वनसीय कारनामा केला. अशा प्रकारे केकेआरने 204 धावांचं आव्हान शेवटच्या बॉलवर पूर्ण करत 3 विकेट्सने विजय मिळवला.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.