AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकण्याची आवश्यकता? जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेतील साखळी फेरीची लढत आता रंगतदार वळणावर आली आहे. शेवटच्या टप्प्यात प्लेऑफसाठी चुरस वाढली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलटफेर होताना दिसत आहे. असं असताना कोणता संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतो आणि किती सामने जिंकावे लागतील याचं गणित समजून घेऊयात.

IPL 2024 : प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकण्याची आवश्यकता? जाणून घ्या
| Updated on: May 06, 2024 | 2:55 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील एकूण 54 सामने संपले असून एकाही संघाने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेलं नाही. सध्याच्या स्थितीत काही संघांचं प्लेऑफचं जर तरवर अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्या संघाला किती सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये स्थान मिळेल? याबाबतची उत्सुकता वाढली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. कोलकात्याने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच नेट रनरेट चांगला असल्याने अव्वल स्थानी आहे. आयपीएलमध्ये 16 गुण मिळवणारा संघ सहज क्वॉलिफाय करतो. त्यामुळे या संघांचं निश्चित झालं आहे. त्यामुळे उर्वरित तीनपैकी एक सामना जिंकला की झालं. अशीच काहीशी स्थिती राजस्थान रॉयल्सची आहे. राजस्थानने 10 पैकी 8 सामन्यात विजय मिळवून 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चार पैकी 1 सामना जिंकलं की झालं.

चेन्नई सुपर किंग्स 11 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. आता उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल. सनरायझर्स हैदराबादने 10 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. चार पैकी तीन सामने जिंकले प्लेऑफमध्ये स्थान मिळेल. लखनौ सुपर जायंट्सचे 11 सामन्यांत 6 विजयासह 12 गुण आहेत. उर्वरित तीन सामने जिंकले तरच ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. पण नेट रनरेटवर लक्ष ठेवावं लागणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघ 11 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. उर्वरित 3 सामने जिंकले तरच दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल. पण पॉइंट टेबलमधील टॉप 4 संघांपैकी एकाने शेवटी 16 गुण मिळवले तरच संधी आहे. ते पण नेट रनरेट ठरवणार काय ते.

आरसीबी संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले असून 4 सामने जिंकून एकूण 8 गुण मिळवले आहेत. आता उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. तसेच इतर संघांच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागेल. टॉप चारमधील एका संघाचे 14 गुण राहिले आणि नेट रनरेट व्यवस्थित असेल तरच संधी आहे. असंच काहीसं पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांचंही आहे. इतर सामने जिंकावे लागतील. तसेच नेट नेटरेटही सुधारावा लागेल.

मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान खऱ्या अर्थाने संपुष्टात आलं आहे. कारण पॉइंट टेबलमधील टॉप चार संघांनी आधीच 12 गुणांचा टप्पा गाठला आहे. चेन्नई, हैदराबाद आणि लखनौने एक सामना जिंकला की मुंबईचा पत्ता कट होईल. इतकंच काय तर मुंबईने तीन पैकी एक सामना गमवला की गणिती आव्हान संपुष्टात येईल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.