AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत WTC फायनल सामन्यात पराभूत, विल्यमसन म्हणतो, ‘भारतीयांनो तुम्ही महान, एका मॅचमधून सगळंच कळत नसतं!’

"भारतीय संघ WTC च्या अंतिम सामन्यात जरुर हरला असेल पण एका मॅचमधून विराट कोहलीची टीम इंडिया किती मजबूत आहे, याचं चित्र स्पष्ट होत नाही. भारतीय खेळाडू महान आणि दिग्गज आहेत. जिंकायचं कसं हे त्यांना चांगलंच माहिती आहे", असं विल्यमसन म्हणाला. (Kane Williamson WTC Final 2021)

भारत WTC फायनल सामन्यात पराभूत, विल्यमसन म्हणतो, 'भारतीयांनो तुम्ही महान, एका मॅचमधून सगळंच कळत नसतं!'
केन विल्यमसन आणि विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) किवी संघाने भारतीय संघाचा (India vs New Zealand) 8 विकेट्सने दणदणीत पराभव केला. पराभवानंतर भारतीय संघाचं ‘चुकलं कुठं?’, याची कारणमिमांसा होत आहे. आता थेट न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) भारतीय संघाच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरला आहे. “भारतीय संघ एक महान संघ आहे. संघात जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. मॅच जरुर महत्त्वाची होती, पण एका मॅचमुळे काही सगळंच चित्र स्पष्ट होत नाही”, असं म्हणत विल्यमसनने भारतीय संघाच्या आक्रमकपणाचं, खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं. (Kane Williamson Statement on ICC WTC Final 2021 India vs New Zealand)

“भारतीय संघ WTC च्या अंतिम सामन्यात जरुर हरला असेल पण एका मॅचमधून विराट कोहलीची टीम इंडिया किती मजबूत आहे, याचं चित्र स्पष्ट होत नाही. भारतीय खेळाडू महान आणि दिग्गज आहेत. जिंकायचं कसं हे त्यांना चांगलंच माहिती आहे”, असं विल्यमसन म्हणाला.

पाऊस आणि अंधूक प्रकाशाचा व्यत्यय सामन्यात वेळोवेळी येत राहिला. तरीही अवघ्या तीन ते सव्वा तीन दिवसांत सामन्याला निकाल किवी संघाने लावला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी किवींनी भारतीय संघाचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला. जवळपास 20 वर्षांनी किवींनी आयसीसी करंडक उंचावला.

टीम इंडिया मजबूत आणि तगडी

केन विल्यमनसने WTC विजयानंतर इंडिया टुडे चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याने भारतीय संघाचं कौतुक केलं. तो म्हणाला, “विश्वचषकाची फायनल मॅच म्हणजे नक्कीच रोमांच उभी करणारी मॅच… या मॅचमध्ये आम्ही जिंकलो, याचा आनंद नक्कीच मोठा आहे. परंतु पराभूत झालेली भारतीय टीम देखील तितकीच मजबूत आणि तगडी आहे. कधी कधी एका मॅचमधून सगळंच चित्र स्पष्ट होत नाही. संघ आणि संघातील खेळाडूंचं टॅलेंट दिसत नाही.”

भारताच्या वेगवान गोलंदाजीची तारीफ

“भारतीय संघाने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या मॅचेसमध्ये विजय मिळवलेत, इथून पुढेही मिळवतील. तुम्ही भारतीय संघाच्या क्वालिटीबद्दल जाणता… भारतीय संघात एका वेगवान गोलंदजांचा भरणा आहे जो जागतिक क्रिकेटमध्ये बेस्ट मानला जातो. भारतीय संघाजवळ फिरकी गोलंदाजी अविश्वसनीय आहे आणि फलंदाजांची डेप्थ देखील अप्रतिम आहे”, असं विल्यमसन म्हणाला.

(Kane Williamson Statement on ICC WTC Final 2021 India vs New Zealand)

हे ही वाचा :

यूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल….

स्मृती मंधानाला लग्नासाठी कसा मुलगा हवा?, चाहत्याच्या प्रश्नावर स्मृतीचं Cute उत्तर

पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटरवर डोपिंग विरोधात कडक कारवाई, चार वर्षांची निर्बंधी

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.