AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket News : सामन्यादरम्यान बॉलिंग करताना मैदानातच अंत; गोलंदाजाचा हार्ट अटॅकने मृत्यू

गेल्या काही वर्षांमध्ये सामन्यादरम्यान मैदानात कोसळून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हॉर्ट अटॅक हे मृत्यूच प्रमुख कारण ठरलंय. अशीच घटना काही दिवसांपूर्वी रोहतकमध्ये घडली. जाणून घ्या नक्की काय झालं?

Cricket News : सामन्यादरम्यान बॉलिंग करताना मैदानातच अंत;  गोलंदाजाचा हार्ट अटॅकने मृत्यू
CricketImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 17, 2025 | 8:11 PM
Share

अतिशय धक्कादायक आणि वाईट वृत्त समोर आलंय. 50 वर्षीय व्यक्तीचा क्रिकेट सामन्यादरम्यान दुर्देवी अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट सामन्यादरम्यान बॉलिंग करताना या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संदीप सिक्का असं मृत व्यक्तीचं नाव आहे. संदीप यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. हरयाणामधील रोहतक जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक क्रिकेट वर्तुळात शोककला पसरली आहे. नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

दोन्ही संघात सामना सुरु होता. फलंदाजी करणाऱ्या संघाचा मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न होता. तर फिल्डिंग करणारी टीम या संघाला झटपट गुंडाळून रोखण्यासाठी प्रयत्नशील होती. संदीप बॉलिंग करत होते. संदीप बॉल टाकल्यानंतर मैदानात पडले आणि बेशुद्ध झाले. त्यामुळे खेळाडूंमध्ये खळबळ उडाली. सामना थांबवण्यात आला. संदीपचे मित्र तातडीने संदीपला रुग्णालयात घेऊन निघाले. मात्र तोवर उशीर झाला होता. संदीप यांचा त्याआधीच मृत्यू झाला होता. सोमवारी संदीप यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.

संदीप सिक्का एका खासगी कंपनीत कार्यरत होते. संदीप सुभाष नगरमधील एका कंपनीत काम करायचे. संदीप कट्टर क्रिकेटप्रेमी होते. त्यामुळे संदीप आणि त्यांचे मित्र रविवारी क्रिकेट खेळायला जायचे. त्यानुसार या रविवारीही ते आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेले. संदीप आणि त्यांचे मित्र रविवारी संध्याकाळी जींद रोडवरील एमएस सरस्वती स्कूलच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले.

दोन्ही संघांचे खेळाडू ठरले. टॉस झाला. त्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. संदीप यांनी संध्याकाळी जवळपास पावणे सहा दरम्यान आपल्या ओव्हरमधील तिसरा बॉल टाकला. संदीप बॉल टाकल्यानंतर मैदानात कोसळले. त्यानंतर मित्रांनी संदीप यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मित्रांनी संदीप यांना स्थानिक रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयात नेण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. संदीप यांच्यावर सोमवारी अंत्य संस्कार करण्यात आले.

हृदयरोगतज्ज्ञाचं म्हणणं काय?

“क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका येणं किंवा हृदय विकाराने मृत्यू होण्यामागे काही कारणं असू शकतात. अनुवांशिकता तसेच व्यायामादरम्यान हृदयावर पडणारा अतिरिक्त ताण हे कारण असू शकतं”, असं हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर आदित्य बतरा यांनी म्हटलं.

“बदललेली लाईफस्टाईल, वाढता ताण, उच्च रक्तदाब आणि हाय कोलेस्ट्रॉल यामुळे हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि निरोगी जीवनशैली आवश्यक आहे”, असंही आदित्य बतरा यांनी म्हटलं.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.