AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak : टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार?

IND vs PAK : उभयसंघात गेल्या 15 वर्षांपासून मालिका खेळवण्यात आलेली नाही. दोन्ही संघात अखेरची कसोटी मालिका ही 2007 मध्ये खेळवण्यात आली होती.

Ind vs Pak : टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार?
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 29, 2022 | 11:33 PM
Share

मुंबई : टीम इंडिया-पाकिस्तान (IND vs PAK) म्हणजे चीर प्रतिद्वंदी. दोन्ही देशातील संबंधांमुळे सध्या तरी दोन्ही संघ फक्त आयसीसी (ICC) स्पर्धेत खेळतात. दोन्ही संघांमध्ये 2007 नंतर द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र भारत-पाक टी 20 वर्ल्ड कपमधील सामन्याला मिळालेली लोकप्रियता पाहता मेलबर्न क्रिकेट क्लब भारत-पाक द्विपक्षीय मालिकेच्या यजमानपदासाठी इच्छूक आहे. एमसीजीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि शासनाने भारत-पाक द्विपक्षीय मालिकेबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी (Cricket Australia) चर्चा केली आहे. (mcc australia is intrested and also offers to host about ind vs pak test series)

एमसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी दोन्ही संघातील कसोटी मालिकेच्या आयोजनाबाबत उत्सुकता दाखवलीय.

एमसीजीत कसोटी मालिकेच्या आयोजनाची शक्यता

“निश्चितप्रमाणे एमसीजीत 3 सामन्यांचं शानदार आयोजन होईल. दरवेळेस स्टेडियम पूर्ण भरलेलं असेल. आम्ही याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. मला माहित आहे की व्हीक्टोरिया सरकारनेही असंच केलं आहे. सध्या सर्व शेड्यूल बिजी आहे. अशा बिजी शेड्यूलमध्ये मालिकेचं आयोजन करणं किचकट आहे. त्यामुळे मालिकेचं आयोजन हे आव्हानात्मक आहे”, असं फॉक्स म्हणाले. ते एसईए रेडियोसोबत बोलत होते.

“क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत आयसीसीशी बोलायला हवं. आशा आहे की ऑस्ट्रेलिया याबाबत आयसीसीशी चर्चा करत राहिल, याबाबत आग्रही असेल. जेव्हा जगातील अनेक स्टेडियम रिकामी पाहता तेव्हा मला असं वाटतं की खचाखच भरलेलं स्टेडियम आणि तिथिल वातावरण खेळासाठी पोषक असेल”, असा आशावादही फॉक्स यांनी व्यक्त केला.

दरम्यान उभयसंघात गेल्या 15 वर्षांपासून मालिका खेळवण्यात आलेली नाही. दोन्ही संघात अखेरची कसोटी मालिका ही 2007 मध्ये खेळवण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत दोन्ही संघ हे फक्त आयसीसी आणि आशिया स्पर्धेतच आमनेसामने येतात.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ