IPL 2021 स्पर्धेत आज अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये खेळवला गेला. आजचा सामना दोन्ही संघासाठी प्ले ऑफच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी महत्त्वाचा होता. सामना तसा अटीतटीचाच झाला. नाणेफेक जिंकत मुंबईने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर उत्तम गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजाना जेरीस आणलं. अखेर 20 षटकात पंजाबने 135 धावा केल्याने मुंबईसमोर 136 धावांचे आव्हान होते. जे सौरभ तिवारीच्या 45 धावांच्या जोरावर अखेऱ हार्दीक (40) आणि पोलार्डने (15) फिनिशिंग टच देत पूर्ण केलं आणि विजय नोदंवला.
मोहम्मद शमीला 19 व्या षटकात 17 धावा ठोकत हार्दीक पंड्याने सामना एक ओव्हर तसेच 6 गडी राखून संघाला जिंकवून दिला.
सामना अतिशय रंगतदार स्थितीत आला आहे. मुंबईला 16 धावांची गरज असून हातात 12 चेंडूच आहेत.
मुंबईचा डाव एकहाती सांभाळणारा सौरभ तिवारी बाद झाला आहे. नॅथन एलीसच्या चेंडूवर यष्टीरक्षक राहुलने त्याचा झेल पकडला आहे. तो 45 धावा करुन बाद झाला आहे.
सुरुवातीच्या तीन विकेट्स गेल्यानंतर सौैरभ तिवारीने हार्दीक पंड्यासोबत मिळून मुंबईचा डाव सांभाळण्यास सुरुवात केली आहे. अजूनही मुंबईला 30 षटकांत 44 धावांची गरज आहे.
रोहितल आणि सूर्या बाद झाल्यानंतर क्विंंटनने सौरभसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण नुकतीच शमीने डिकॉकची विकेट घेतली आहे.
पंजाबच्या रवी बिश्नोईने उत्कृष्ट गोलंदाजी करत एकाच षटकात मुंबईला दोन मोठे धक्के दिले आहेत. आधी रोहितला 8 धावांवर बाद केल्यानंतर सूर्यकुमारला शून्यावर बाद केलं आहे.
मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक फलंदाजीला आले आहेत. 135 धावांच पाठलाग करण्यासाठी त्यांनी संयमी खेळीने सुरुवात केली आहे.
पंजाब संघाला प्रथम फलंदाजी मिळाली असली तरी त्यांनी खास कामगिरी न केल्यामुळे केवळ 135 धावांपर्यत मजल मारली आहे. यामध्ये मार्करम (42) आणि दीपक हुडा (28) यांच्या भागिदारीमुळे संघाने इथवर मजल मारली आहे.
पंजाबचा डाव सावरत असलेल्या दीपक हुडाला बाद करण्यातही मुंबईला यश आलं आहे. बुमराहच्या चेंडूवर पोलार्डने त्याचा झेल घेतला आहे.
चार गडी बाद झाल्यानंतर पंजाब संघाकडून मार्करम आणि दिपक हुड्डा हे दोघे एक चांगली खेळी करत होते. पण राहुल चाहरने मार्करमला 42 धावा झाल्या असताना बाद करत एक चांगली भागिदारी तोडली आहे.
पंजाबचा खराब खेळ सुरु असून निकोलस पुरनही बाद झाला आहे. बुमराहनं त्याची विकेट घेतली आहे.
मुंबईच्या पोलार्डला एकाच षटकात दोन मोठे विकेट मिळाले आहेत. त्याने केएल राहुल आणि ख्रिस गेल अशा दोघांना बाद करत संघाला मोठं यश मिळवून दिलं आहे,
पंजाबचा धाकड फलंदाज ख्रिस गेल आज काही कमाल करु शकला नाही. पोलार्डच्या चेंडूवर हार्दीकने त्याचा झेळ घेत त्याला एका धावेवर बाद केले आहे.
सामन्याला सुरुवात झाली असून पंजाब किंग्स संघाकडून सलामीवीर केएल राहुल आणि मनदीप सिंग हे फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Match 42. Mumbai Indians win the toss and elect to field https://t.co/jAzxzdfGVI #MIvPBKS #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) September 28, 2021
आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि पंजाब 27 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघानी एकमेंकाना तोडीस तोड खेळ केला आहे. केवळ एका विजयाच्या फरकाने मुंबई पुढे आहे. मुंबईने 14 सामने जिंकले असून पंजाबने 13 सामने जिंकले आहेत. दरम्यान आज होणारा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता याठिकाणी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध एकच सामना खेळले असून तो सामना मुंबईनेच जिंकला आहे.