AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs IND | कुलदीप यादव याचा ‘पंच’, टीम इंडियाचा पाकिस्तानवर 228 धावांनी ऐतिहासिक विजय

Pakistan vs India Asia Cup 2023 Super 4 | टीम इंडियाने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानवर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत सुपर 4 मध्ये शानदार सुरुवात केली आहे.

PAK vs IND | कुलदीप यादव याचा 'पंच', टीम इंडियाचा पाकिस्तानवर 228 धावांनी ऐतिहासिक विजय
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (राखीव विकेटीकपर), हार्दिक पांड्या (उपकप्तान), रवींद्र जेडजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
| Updated on: Sep 12, 2023 | 2:09 AM
Share

कोलंबो | अखेर अनेक विघ्नानंतर पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याच्या निकाल लागला आहे. टीम इंडियाने आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामना राखीव दिवशी तब्बल 228 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आहे. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र कुलदीप यादव याच्या फिरकीसमोर पाकिस्तानचे गोलंदाज टिकू शकले नाहीत. कुलदीपने फहीम अश्रफ याला आऊट करत 5 विकेट्स पूर्ण केल्या. यामुळे पाकिस्तानची 32 ओव्हरमध्ये 8 बाद 128 अशी स्थिती झाली. त्यानंतर नसीम शाह आणि हरीस रौफ या दोघांची बॅटिंगला येण्याची वेळ होती. मात्र दोघेही दुखापतीमुळे बॅटिंग करण्यास अक्षम होते. त्यामुळे इथेच सामना टीम इंडियाने जिंकल्याची घोषणा करण्यात आली.

कुलदीप यादवकडून पाकिस्तानचा ‘पंच’नामा

टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला विशेष काहीच करता आलं नाही. ओपनर फखर झमान याने सर्वाधिक 27 धावा केल्या. आघा सलमान आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी प्रत्येकी 23 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन बाबर आझम याने 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर इतर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून चायनमन बॉलर कुलदीप यादव याने दुसऱ्यांदा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. तर शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाचा धमाकेदार विजय

राखीव दिवसाला सुरुवात

त्याआधी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राखीव दिवसाचा खेळाला दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. टीम इंडियाच्या केएल राहुल आणि विराट कोहली यांनी मुख्य दिवशी खेळ जिथे थांबला तिथून म्हणजेच 24.1 ओव्हर 147- 2 या धावसंख्येपासून सुरुवात केली. या दोघांनी अशी बॅटिंग केली की इतरांना संधी दिलीच नाही. या दोघांनी 50 ओव्हरपर्यंत 195 बॉलमध्ये 233 धावांची नाबाद भागीदारी करत टीम इंडियाला 357 धावांपर्यंत पोहचवलं.

टीम इंडियाकडून विराट कोहली याने 94 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 122 धावा केल्या. तर केएल राहुल याने 6 महिन्यांनी दमदार कमबॅक केलं. केएलने 106 बॉलमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 111 धावांची नाबाद खेळी केली. तर त्याआधी मुख्य दिवशी कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 103 बॉलमध्ये 121 पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर दोघेही सलग 2 ओव्हरमध्ये आऊट झाले. रोहितने 56 आणि शुबमनने 58 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.