
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या भेटीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा केली.श्रीलंकेने पंतप्रधान मोदींना ‘मित्र विभूषण’ देऊन सन्मानित केले. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान स्वीकारताना सांगितलं की, 140 कोटी भारतीयांसाठी सन्मान आहे. 2014 नंतरचा हा त्यांचा श्रीलंकेचा चौथा दौरा आहे. दुसरीकडे, 1996 वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंचीही भेट घेतली. यावेळी सनथ जयसूर्या, अरविंदा डी सिल्वा, चामिंडा वास, अटापट्टूसह इतर खेळाडू होते. दिग्गज खेळाडूंची भेट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली. यावेळी त्यांनी लिहिलं की, ‘1996 मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाच्या सदस्यांना भेटून आनंद झाला. हा असा संघ आहे ज्याने केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर जगभरातील लाखो क्रीडाप्रेमींच्या कल्पनाशक्तीलाही जिवंत केले.’ दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या, रोमेश कालुविथरना आणि अरविंद डीसिल्वा यांनीही प्रतिक्रिया दिल्या.
अरविंद डी सिल्वा यांनी सांगितलं की, ‘जग पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करते. त्याने आपल्या भारत देशासाठी खूप काही केले आहे. इतक्या मोठ्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे ही एक मोठी उपलब्धी आहे.’
Cricket connect!
Delighted to interact with members of the 1996 Sri Lankan cricket team, which won the World Cup that year. This team captured the imagination of countless sports lovers! pic.twitter.com/2ZprMmOtz6
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2025
सनथ जयसूर्या याने सांगितलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे हा एक अद्भुत अनुभव होता. त्यांनी भारत एक राष्ट्र म्हणून कसा विकसित झाला आहे हे स्पष्ट केले. आम्ही इतर अनेक गोष्टींबद्दल आणि क्रिकेटबद्दलही बोललो. त्यांनी भारतात सत्ता कशी हाती घेतली आणि देशाचा विकास कसा केला याबद्दल आम्ही त्यांच्याशी बोललो.’
‘It was a great experience meeting PM @narendramodi. He explained nicely how he developed India as a nation’, says Sanath Jayasuriya former Sri Lankan cricketer after meeting PM Modi. pic.twitter.com/s8ZCOFPhRW
— DD News (@DDNewslive) April 5, 2025
रोमेश कालुविथरणा याने सांगितलं की, ‘नरेंद्र मोदी भारतात सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. भारताच्या पंतप्रधानांनीही श्रीलंकेसाठी खूप काही केले आहे. संकटाच्या काळात भारत नेहमीच श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिला आहे.’