AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: उस्मान तारीकचा प्रश्न आणि सूर्यकुमार यादवने ताडकन दिलं उत्तर, त्याच्यासाठी आम्ही…

भारत पाकिस्तान सामना कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी आहे. त्यामुळे पाकिस्तानचा उस्मान तारीक भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की...

IND vs PAK: उस्मान तारीकचा प्रश्न आणि सूर्यकुमार यादवने ताडकन दिलं उत्तर, त्याच्यासाठी आम्ही...
IND vs PAK: उस्मान तारीकचा प्रश्न आणि सूर्यकुमार यादवने ताडकन दिलं उत्तर, त्याच्यासाठी आम्ही...Image Credit source: PTI/Money 9 वरून
| Updated on: Feb 14, 2026 | 9:38 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानच्या उस्मान तारीकच्या गोलंदाजीची स्तुती होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण त्याची गोलंदाजी शैली आणि चेंडू टाकण्याची पद्धत यामुळे फलंदाजांना फटका मारताना अडचण येते. चेंडू टाकण्यापूर्वी थांबणं आणि साइड आर्म एक्शनसह चेंडू सोडणं. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात असंच झालं. उस्मान तारीकने या सामन्यात केलेली गोलंदाजी चर्चेत राहिली. या सामन्यात त्याने चार षटकं टाकली आणि 27 धावा देत 3 विकेट काढल्या. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्यात त्याची भीती सतावत आहे. पण असं असलं तरी भारतीय संघ त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवला उस्मान तारीकबाबत प्रश्न विचारला गेला. पाकिस्तानी पत्रकाराने तारीकचा उल्लेख ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असा केला. त्यावर सूर्यकुमार यादवने रोखठोक उत्तर दिलं.

भारतीय संघ पहिल्यांदाच तारीक उस्मानचा सामना करणार आहे. त्यामुळे त्याचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘जर परीक्षेत सिलॅबसबाहेरचा प्रश्न आला तर तु्म्ही तो प्रश्न सोडत नाही तर त्याचं उत्तर देण्याचं प्रयत्न करता.’ सूर्यकुमार यादवने या प्रश्नचं उत्तर देताना पुढे स्पष्ट केलं की, ‘आमचा हाच प्रयत्न असेल. तो एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे. पण आम्ही शरणागती पत्कारणारनाही. आम्ही अशा पद्धतीच्या गोलंदाजांविरुद्ध सराव करतो. आम्ही सराव शिबिरात याबाबत अभ्यास केला आहे. आता ते प्रत्यक्ष मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करू.’

गेल्या वर्षभरात भारतीय संघ फिरकीचा सामना करताना अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात पाकिस्तानकडे फिरकीची फौज आहे. त्यामुळे भातीय संघाला काळजीपूर्वक कामगिरी करावी लागणार आहे. कोलंबोची खेळपट्टी संथ आणि फिरकीला पूरक आहे. भारताची जमेची बाजू म्हणजे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करू शकतो. त्यामुळे दडपण आलं तरी एखाद दुसऱ्या गोलंदाजाला टार्गेट करता येईल. आता तारीकची गोलंदाजी कशी होते आणि भारतीय फलंदाज कसा सामना करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?