India Cricket team: विराटनंतर टी20 संघाचा कर्णधार कोण?, तिघांमध्ये चुरशीची लढत, द्रविडची पसंती कोणाला?

| Updated on: Nov 05, 2021 | 5:29 PM

भारतीय संघात टी20 विश्वचषकानंतर अनेक बदल होणार असून यातील पहिला बदल नुकताच झाला. रवी शास्त्रीनंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे स्पष्ट झालं. पण विराट नंतर टी20 संघाचा कर्णधार कोण होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

1 / 5
सध्या टी20 विश्वचषकात  (T20 World Cup) भारताची कामगिरी खास दिसून आलेली नाही. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना भारताने जिंकला आहे. पण तरी देखील पुढील फेरीत प्रवेशासाठी भारताला इतर संघावर अवंलंबून रहावे लागले आहे. दरम्यान संघात अव्वल दर्जाचे खेळाडू असतानाही ही अवस्था असल्याने संघ व्यवस्थापन पुढील विश्वचषकापूर्वी अनेक बदल करणार हे नक्की! अशावेळी टी20 संघाचा कर्णधार विराटने (Virat Kohli) स्पर्धेपूर्वीच टी20 संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याजागी कोणाचं नाव येणार ही चर्चा असताना नव्याने नियुक्त हेड कोच द्रविडची पसंती एका अनुभवी भारतीय खेळाडूला आहे.

सध्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताची कामगिरी खास दिसून आलेली नाही. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना भारताने जिंकला आहे. पण तरी देखील पुढील फेरीत प्रवेशासाठी भारताला इतर संघावर अवंलंबून रहावे लागले आहे. दरम्यान संघात अव्वल दर्जाचे खेळाडू असतानाही ही अवस्था असल्याने संघ व्यवस्थापन पुढील विश्वचषकापूर्वी अनेक बदल करणार हे नक्की! अशावेळी टी20 संघाचा कर्णधार विराटने (Virat Kohli) स्पर्धेपूर्वीच टी20 संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याजागी कोणाचं नाव येणार ही चर्चा असताना नव्याने नियुक्त हेड कोच द्रविडची पसंती एका अनुभवी भारतीय खेळाडूला आहे.

2 / 5
रवी शास्त्रीनंतर भारतीय संघाचा हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) संघात काय बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशावेळी  द्रविडच्या मते विराटनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार व्हावा, असं  इंडियन एक्सप्रेसमध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

रवी शास्त्रीनंतर भारतीय संघाचा हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) संघात काय बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशावेळी द्रविडच्या मते विराटनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार व्हावा, असं इंडियन एक्सप्रेसमध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

3 / 5
रोहित शर्मा याने विराटच्या अनुपस्थित अनेकदा संघाचं कर्णधारपद सांभाळलं आहे. त्याने आशिया चषकासारख्या स्पर्धाही जिंकवल्या असून आयपीएलमधील तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने पाच वेळा मुंबई इंडियन्सला ट्रॉफी जिंकवून दिली आहे.

रोहित शर्मा याने विराटच्या अनुपस्थित अनेकदा संघाचं कर्णधारपद सांभाळलं आहे. त्याने आशिया चषकासारख्या स्पर्धाही जिंकवल्या असून आयपीएलमधील तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने पाच वेळा मुंबई इंडियन्सला ट्रॉफी जिंकवून दिली आहे.

4 / 5
रोहितनंतर आणखी दोन नावं प्रकर्षाने चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant). पंत हा एक युवा खेळाडू असून त्याचा खेळ अगदी वेगळ्या प्रकारचा आहे. फिनीशरच्या भूमिकेत असणारा पंत एक उत्तम फलंदाजासह भारताचा मुख्य यष्टीरक्षक आहे. आयपीएलमध्येही तो दिल्ली संघाचा कर्णधार असून यंदा त्याने प्लेऑफपर्यंत संघाला नेलं होतं. त्यामुळे त्याचही नाव कॅप्टन्सीच्या शर्यतीत आहे.

रोहितनंतर आणखी दोन नावं प्रकर्षाने चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant). पंत हा एक युवा खेळाडू असून त्याचा खेळ अगदी वेगळ्या प्रकारचा आहे. फिनीशरच्या भूमिकेत असणारा पंत एक उत्तम फलंदाजासह भारताचा मुख्य यष्टीरक्षक आहे. आयपीएलमध्येही तो दिल्ली संघाचा कर्णधार असून यंदा त्याने प्लेऑफपर्यंत संघाला नेलं होतं. त्यामुळे त्याचही नाव कॅप्टन्सीच्या शर्यतीत आहे.

5 / 5
India Cricket team: विराटनंतर टी20 संघाचा कर्णधार कोण?, तिघांमध्ये चुरशीची लढत, द्रविडची पसंती कोणाला?