AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: दुसऱ्या पराभवानंतर Rishabh Pant चा दोन प्रमुख गोलंदाजांना स्पष्ट संदेश, पुढच्या सामन्यात प्रदर्शन सुधारा, अन्यथा….

ऋषभ पंत (Rishabh Pant) भलेही भारतीय क्रिकेट संघाचा तात्पुरता कर्णधार असेल, पण त्याला स्वत:कडून व संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. कॅप्टन म्हणून ऋषभ नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.

IND vs SA: दुसऱ्या पराभवानंतर Rishabh Pant चा दोन प्रमुख गोलंदाजांना स्पष्ट संदेश, पुढच्या सामन्यात प्रदर्शन सुधारा, अन्यथा....
Team india Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 13, 2022 | 10:52 AM
Share

मुंबई: ऋषभ पंत (Rishabh Pant) भलेही भारतीय क्रिकेट संघाचा तात्पुरता कर्णधार असेल, पण त्याला स्वत:कडून व संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. कॅप्टन म्हणून ऋषभच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दिल्ली पाठोपाठ कटकमध्येही (Cuttack T 20) दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या पदरी निराशा आली. कटकमध्ये झालेल्या पराभवामागे फलंदाजांची सुमार कामगिरी हे एक कारण आहे. यावेळी फलंदाजांनी निराश केलं. पंत या सामन्यानंतर काही खेळाडूंना कामगिरी सुधारण्याचा सल्ला दिला. कटक येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) भारताचा 4 विकेटने पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 148 धावा केल्या होत्या. धावा कमी होत्या, तरी फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. पहिल्या 10 षटकात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 57 होती. भुवनेश्वर कुमारने पावरप्लेमध्ये तीन विकेट काढून चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र तरीही टीम इंडियाचा पराभव झाला.

कधी खेळ पालटला?

“10 ते 15 धावा कमी पडल्या. गोलंदाजी करताना चांगल्या सुरुवातीनंतरही शेवटच्या 10 षटकात अनुकूल गोष्टी घडल्या नाहीत” असं ऋषभ पंत म्हणाला. “प्रथम फलंदाजी करताना 10-15 धावा कमी केल्या. भुवी आणि अन्य गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण दुसऱ्याहाफमध्ये अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत. 10-11 ओव्हर्सनंतर आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. तिथूनच मॅचची दिशा बदलली”, असं ऋषभ म्हणाला.

दोन गोलंदाजांना थेट इशारा

ऋषभ पंतने युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या स्पिन जोडीला पुढच्या सामन्यांमध्ये प्रदर्शन सुधारण्याचा सल्ला दिला. फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. अंतिम तीन सामने आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करु, असं तो म्हणाला. भारताचे प्रमुख तीन वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान यांनी 10 ओव्हर्समध्ये 47 धावा दिल्या व 5 विकेट काढले. तेच युजवेंद्र चहल-अक्षर पटेल जोडीने पाच ओव्हर्समध्ये 68 रन्स दिल्या व 1 विकेट काढला. दिल्लीमध्येही या दोघांची धुलाई झाली होती.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.