AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन्सी करणार!

Indian Cricket Team | टीम इंडियाला 2013 पासून आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडिया 2023 मध्ये 2 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आता बीसीसीआय तयारीला लागली आहे.

Team India | रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन्सी करणार!
| Updated on: Jan 02, 2024 | 4:02 PM
Share

मुंबई | रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अखेरची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या वर्षातील पहिला सामना हा 3 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्याची सांगता झाल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी 2024 हे वर्ष खास आहे, कारण टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या दृष्टीने बीसीसीआय तयारीला लागल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने टी 20 वर्ल्ड कपसमोर ठेऊन रोहित शर्माला मोठी जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तान या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआय या मालिकेसाठी टीम इंडियाची जबाबदारी ही रोहित शर्माला देणार असल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआय टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने ही हालचाल करत असल्याची चर्चाही क्रिकेट विश्वात रंगली आहे.

हार्दिक पंड्या हा टी 20 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतो. मात्र हार्दिक दुखापतीमुळे गेल्या 2 महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे. हार्दिकला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीममधून आऊट झालाय.

त्यामुळे सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र सूर्यालाही दुखापत झालीय. सूर्याला या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी आणखी काही आठवडे लागणार आहेत. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रोहितसाठी टीममध्ये कॅप्टन्सीसह कमबॅकसाठी यासारखी दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही.

हिटमॅनचा होकार!

टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार!

“आम्ही रोहितसोबत दीर्घ चर्चा केली. त्यानंतर रोहितने टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करण्यास होकार दिला”, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर 3 ते 7 जानेवारी दरम्यान टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे आता या सीरिजसाठी कुणाला संधी मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.