AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन्सी करणार!

Indian Cricket Team | टीम इंडियाला 2013 पासून आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडिया 2023 मध्ये 2 वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आता बीसीसीआय तयारीला लागली आहे.

Team India | रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन्सी करणार!
| Updated on: Jan 02, 2024 | 4:02 PM
Share

मुंबई | रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अखेरची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या वर्षातील पहिला सामना हा 3 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्याची सांगता झाल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी 2024 हे वर्ष खास आहे, कारण टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या दृष्टीने बीसीसीआय तयारीला लागल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने टी 20 वर्ल्ड कपसमोर ठेऊन रोहित शर्माला मोठी जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तान या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआय या मालिकेसाठी टीम इंडियाची जबाबदारी ही रोहित शर्माला देणार असल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआय टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने ही हालचाल करत असल्याची चर्चाही क्रिकेट विश्वात रंगली आहे.

हार्दिक पंड्या हा टी 20 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतो. मात्र हार्दिक दुखापतीमुळे गेल्या 2 महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे. हार्दिकला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीममधून आऊट झालाय.

त्यामुळे सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र सूर्यालाही दुखापत झालीय. सूर्याला या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी आणखी काही आठवडे लागणार आहेत. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रोहितसाठी टीममध्ये कॅप्टन्सीसह कमबॅकसाठी यासारखी दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही.

हिटमॅनचा होकार!

टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार!

“आम्ही रोहितसोबत दीर्घ चर्चा केली. त्यानंतर रोहितने टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करण्यास होकार दिला”, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार?

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयची राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर 3 ते 7 जानेवारी दरम्यान टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे आता या सीरिजसाठी कुणाला संधी मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.