IND vs WI: टीम इंडियाने सीरीज जिंकली, पण मी नाखुश आहे, असं श्रेयस अय्यरने का म्हटलं?

टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वनडे सीरीज (ODI Series) मध्ये हरवलं आहे. भारताने रविवारी दुसऱ्यावनडेत 2 विकेटने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

IND vs WI: टीम इंडियाने सीरीज जिंकली, पण मी नाखुश आहे, असं श्रेयस अय्यरने का म्हटलं?
team-indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:56 PM

मुंबई: टीम इंडियाने वेस्ट इंडिजला वनडे सीरीज (ODI Series) मध्ये हरवलं आहे. भारताने रविवारी दुसऱ्यावनडेत 2 विकेटने विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध अक्षर पटेल, (Axar Patel) संजू सॅमसनने (Sanju Samson) अर्धशतक फटकावलं. त्याशिवाय श्रेयस अय्यरने सुद्धा हाफ सेंच्युरी झळकवली. पण तरीही श्रेयस अय्यर निराश आहे. “मी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पण अर्धशतक शतकामध्ये बदलता येत नसल्याने निराश आहे” असं श्रेयसने सामन्यानंतर सांगितलं.

श्रेयस अय्यरची चांगली कामगिरी

अय्यरने दुसऱ्या वनडेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 71चेंडूत 63 धावा केल्या. अय्यरने संजू सॅमसनसोबत चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. सॅमसनने 54 धावा केल्या. अक्षर पटेलने नाबाद 64 धावा फटकावून भारताला विजय मिळवून दिला. अंतिम 3 चेंडूत भारताला विजयासाठी 5 धावांची गरज होती. अक्षर पटेलने चौथ्या चेंडूवर षटकार मारुन टीम इंडियाला मालिकेत विजयी आघाडी मिळवून दिली. दरम्यान अय्यर ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावर तो निराश आहे.

मी आनंदी आहे, पण….

“मी ज्या धावा केल्या, त्याने आनंदी आहे. पण मी ज्या पद्धतीने आऊट झालो, त्यावर नाखुश आहे. मला संघाला सहजपणे विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होतं. मी चांगली सुरुवात केली. पण दुर्भाग्यपूर्ण पद्धतीने विकेट गमावला. पुढच्या सामन्यात यापेक्षा चांगली कामगिरी करेन आणि शतक बनवीन अशी अपेक्षा आहे” असं श्रेयस अय्यर म्हणाला.

श्रेयसच्या मनात शतक न बनवता आल्याची खंत

श्रेयस अय्यरच्या मनात शतक न बनवण्याची खंत आहे. मी सहजपणे माझा विकेट गमावला नाही. चांगल्या सुरुवातीला शतकामध्ये बदलायला पाहिजे होतं, असं श्रेयसच मत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात अशा प्रकारची सुरुवात नेहमी मिळत नाही, असं अय्यरने सांगितलं. म्हणून अर्धशतकाला शतकामध्ये बदलणं महत्त्वाचं आहे. माझ्याकडे चांगली संधी होती. पण चुकलो, असं श्रेयस म्हणाला.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.