AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वेदना पचवणं सोपं नसतं’, दिल्लीने कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या मुद्यावर श्रेयस अय्यरचं पहिल्यांदाच भाष्य

श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आता आयपीएलमधील केकेआर (KKR) फ्रेंचायजीचा कर्णधार आहे. कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयसला कॅप्टन बनवलं आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने 12.5 कोटी रुपयांची मोठी किंमत मोजून श्रेयसला विकत घेतलं.

'वेदना पचवणं सोपं नसतं', दिल्लीने कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या मुद्यावर श्रेयस अय्यरचं पहिल्यांदाच भाष्य
दिल्ली कॅपिटल्सने कर्णधारपदावरुन हटवण्याच्या विषयावर श्रेयस अय्यरचं भाष्यImage Credit source: INSTAGRAM
| Updated on: Mar 01, 2022 | 11:54 AM
Share

मुंबई: श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आता आयपीएलमधील केकेआर (KKR) फ्रेंचायजीचा कर्णधार आहे. कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयसला कॅप्टन बनवलं आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने 12.5 कोटी रुपयांची मोठी किंमत मोजून श्रेयसला विकत घेतलं. त्याच्यातील नेतृत्व गुण हेरुनच त्याला संघाचं कर्णधार बनवण्यात आलय. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने जी कामगिरी केली ते पाहूनच त्याला केकेआरने कॅप्टन बनवलयं. श्रेयसने दिल्लीची साथ सोडली, त्यामागे ऋषभ पंतला कॅप्टन बनवणं हे एक प्रमुख कारण आहे. मागच्या सीजनमध्ये पहिल्या सत्रात श्रेयस दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळला नाही. त्यावेळी ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आलं. श्रेयस दुखापतीमधून सावरुन परतला, तेव्हा सुद्धा कॅप्टनशिप ऋषभकडेच ठेवली. त्यामुळे श्रेयसने अखेर दिल्लीचा संघ सोडला. आता श्रेयसने या विषयावर आपली बाजू मांडली आहे.

…तर माझं कर्णधारपद गेलं नसतं

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसला या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. ती दुखापत मोठा झटका होती की, दिल्लीचं कर्णधारपद जाणं. त्यावर अय्यरने दुखापत झाली नसती, तर कर्णधारपद गेलं नसतं, असं उत्तर दिलं.

“ती दुखापत माझ्यासाठी एक मोठा झटका ठरली. दुखापत झाली नसती, तर दिल्ली कॅपिटल्सने मला कर्णधारपदावरुन हटवलं नसतं” असं श्रेयसने सांगितलं. “2019-20 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात एक वातावरण निर्मिती झाली होती. त्याची प्रतिमा तुम्हाला 2021 मध्ये पहायला मिळाली. दिल्ली संघातील वातवरण कमालीचं होतं. प्रत्येक खेळाडू परस्परांना ओळखत होता. प्रत्यकेाला आपली कमकुवत बाजू आणि ताकत याची कल्पना होती” असे श्रेयसने सांगितलं.

दुखापतीनंतर श्रेयस अय्यर अधिक चांगला खेळाडू बनला

“काही वेळा काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात. ही गोष्ट आपल्या नंतर लक्षात येते. न्यूझीलंडमध्ये मी जबरदस्त फॉर्ममध्ये होतो. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास भरला होता. कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये मी 500 धावा केल्या होत्या. त्यानंतर मला दुखापत झाली. ती गोष्ट माझ्या डोक्यात बसली. दुखापती नंतरच्या वेदना सहन करणं सोपं नसतं. दुखापत झाल्यानंतर ती बरी होण्यापर्यंतची प्रक्रिया खूपच कठीण असते. पण दुखापत माझ्यासाठी चांगली ठरली. मला दुखापत झाली नसती, तर आज मी जे आहे ते फक्त 50 टक्केच असतो. जे होत ते चांगल्यासाठीच घडतं” असं श्रेयसने सांगितलं.

shreyas iyer speaks on removing him from delhi capitals captainship rishabh pant ipl 2022

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.