AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? क्रीडा मंत्री म्हणाले..

Anurag Thakur On India vs Pakistan Bilateral Series | टीम इंडिया-पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. आता याबाबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर काय म्हणाले?

IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? क्रीडा मंत्री म्हणाले..
| Updated on: Sep 16, 2023 | 5:18 PM
Share

मुंबई | भारत आणि पाकिस्तान, या दोन्ही देशात गेल्या अनेक वर्षांपासूनचे तणावपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेकदा सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झालेत. तसेच याच पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर 2008 साली दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप मृत्यूमुखी पडले. यामुळे पाकिस्तानची मस्ती जिरवण्यासाठी भारत सरकारने आतापर्यंत अनेक निर्णय घेतलेत. इतकंच काय या संबंधांचा परिणाम हा इतर क्षेत्रांवरही झालाय.

पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हाकलून लावण्यात आलंय. तसेच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही. दोन्ही देशातीलं तणावपूर्ण संबंधांमुळे टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 2013 पासून द्विपक्षीय क्रिकेट मालिकाही खेळवण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ फक्त आता आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. या दोन्ही संघामधील सामन्यांची प्रतिक्षा ही क्रिकेट विश्वाला असते. टीम इंडियाने नुकतंच आशिया कप 2023 सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या दरम्यान टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनूराग ठाकूर यांनी या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील द्विपक्षीय मालिकेबाबत मोठं विधान केलं आहे.

अनुराग ठाकूर काय म्हणाले?

“जिथवर खेळाचाच प्रश्न आहे, तर बीसीसीआयने याबाबत खूप आधीच निर्णय घेतलाय. जोवर पाकिस्तान सीमेवरील कुरापती थांबवत नाहीत तोवर टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार नाही. मला वाटतं की हीच आणि अशीच प्रत्येक नागरिकाची भावना आहे”, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

अनुराग ठाकूर यांची टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत प्रतिक्रिया

टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने

दरम्यान आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपेक्षा क्रिकेट चाहत्यांना 14 ऑक्टोबरची प्रतिक्षा आहे. कारण 14 ऑक्टोबरला टीम इंडिया-पाकिस्तान चीर प्रतिद्वंदी भिडणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.