AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? क्रीडा मंत्री म्हणाले..

Anurag Thakur On India vs Pakistan Bilateral Series | टीम इंडिया-पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. आता याबाबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर काय म्हणाले?

IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? क्रीडा मंत्री म्हणाले..
| Updated on: Sep 16, 2023 | 5:18 PM
Share

मुंबई | भारत आणि पाकिस्तान, या दोन्ही देशात गेल्या अनेक वर्षांपासूनचे तणावपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेकदा सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झालेत. तसेच याच पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर 2008 साली दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप मृत्यूमुखी पडले. यामुळे पाकिस्तानची मस्ती जिरवण्यासाठी भारत सरकारने आतापर्यंत अनेक निर्णय घेतलेत. इतकंच काय या संबंधांचा परिणाम हा इतर क्षेत्रांवरही झालाय.

पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हाकलून लावण्यात आलंय. तसेच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही. दोन्ही देशातीलं तणावपूर्ण संबंधांमुळे टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 2013 पासून द्विपक्षीय क्रिकेट मालिकाही खेळवण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ फक्त आता आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. या दोन्ही संघामधील सामन्यांची प्रतिक्षा ही क्रिकेट विश्वाला असते. टीम इंडियाने नुकतंच आशिया कप 2023 सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या दरम्यान टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनूराग ठाकूर यांनी या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील द्विपक्षीय मालिकेबाबत मोठं विधान केलं आहे.

अनुराग ठाकूर काय म्हणाले?

“जिथवर खेळाचाच प्रश्न आहे, तर बीसीसीआयने याबाबत खूप आधीच निर्णय घेतलाय. जोवर पाकिस्तान सीमेवरील कुरापती थांबवत नाहीत तोवर टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार नाही. मला वाटतं की हीच आणि अशीच प्रत्येक नागरिकाची भावना आहे”, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

अनुराग ठाकूर यांची टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत प्रतिक्रिया

टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने

दरम्यान आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपेक्षा क्रिकेट चाहत्यांना 14 ऑक्टोबरची प्रतिक्षा आहे. कारण 14 ऑक्टोबरला टीम इंडिया-पाकिस्तान चीर प्रतिद्वंदी भिडणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.