IND vs PAK : भारतीय संघ अर्ध्या रस्त्यात असताना पाकिस्तानची तयारी, दोन दिवसापूर्वी केलं असं काही

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की द्वंद्व.. तसं पाहिला तर हा एक क्रिकेट सामना आहे. पण त्याला आता युद्धाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळे दोन संघ विजयासाठी जीवाची बाजी लावतात. आता या सामन्यापूर्वी पाकिस्तानने रणनिती आखली आहे.

IND vs PAK : भारतीय संघ अर्ध्या रस्त्यात असताना पाकिस्तानची तयारी, दोन दिवसापूर्वी केलं असं काही
IND vs PAK : भारतीय संघ अर्ध्या रस्त्यात असताना पाकिस्तानची तयारी, दोन दिवसापूर्वी केलं असं काही
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 13, 2026 | 11:00 PM

भारत पाकिस्तान 15 फेब्रुवारीला श्रीलंकेच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया नामिबियाविरुद्धचा सामना खेळून रवाना झाली आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला सुपर 8 फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. भारताने गेल्या काही वर्षात मल्टी नॅशनल सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहते चवताळले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप जिंकला नाही तरी चालेल पण भारताला पराभूत करावं अशी त्यांची भावना आहे. असं असताना भारतीय संघाची बाजू भक्कम आहे. त्यामुळे भारताला पराभूत करणं हे काही सोपं काम नाही. दुसरीकडे, पाकिस्तानने भारतीय संघ श्रीलंकेला पोहोचण्यापूर्वीच तयारी सुरू केली आहे.

पाकिस्तानचा संघ श्रीलंकेत असल्याने त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. पाकिस्तानने शुक्रवारी प्रेमादासा स्टेडियममध्ये चांगलाच घाम गाळला. फलंदाजांनी नेटमध्ये जोरदार सराव केला. या सरावात पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामुळे मैदानातील वातावरण समजून घेण्यास पाकिस्तानी खेळाडूंना मदत झाली आहे. पाकिस्तानी संघाला खेळपट्टी, मैदान आणि कोलंबोतील वातावरणाशी जुळवून घेता आलं आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तानचा संघ सर्व सामने श्रीलंकेतच खेळत आहे. त्याने दोन सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास वाढला आहे. पण पाकिस्तानला या संधीचा फायदा मिळेल का? हा प्रश्न देखील आहे.

भारतीय संघ 12 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध दिल्लीत सामना खेळली. या सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाने गुरूवारी आराम केला आणि शुक्रवारी संध्याकाळी श्रीलंकेला प्रस्थान केलं. म्हणजेच शुक्रवारी भारताने सराव केला नाही. त्यामुळे भारताला सामन्यापूर्वी फक्त एका दिवसाचा अवधी मिळणार आहे. भारतीय संघ टी20 क्रिकेट सलग खेळत आहे. त्यामुळे सरावासाठी एक दिवस पुरेसा आहे. पण एका दिवसात वातावरणाशी जुळवून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण गेल्या काही दिवसात खेळाडूंचं आजारपण बळावलं आहे. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यापूर्वी एखादा खेळाडू आजारी पडला तर चित्र काही वेगळंच होऊ शकतं.