AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC, India vs Pakistan : पाकिस्तानचा आफ्रिदी भारताला खतरनाक नडला, दोन्ही सलामीवीरांना घातक ठरला, रोहित पायचित, तर राहुलचा त्रिफळा

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 विश्वचषक सामन्याचा थरार सुरु झाला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय ते मैदानावर योग्य ठरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

T20 WC, India vs Pakistan : पाकिस्तानचा आफ्रिदी भारताला खतरनाक नडला, दोन्ही सलामीवीरांना घातक ठरला, रोहित पायचित, तर राहुलचा त्रिफळा
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 8:23 PM
Share

T20 World Cup 2021 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 विश्वचषक सामन्याचा थरार सुरु झाला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय ते मैदानावर योग्य ठरवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. कारण पाकिस्तानने भारताच्या दोन मातब्बर सलामीवीरांना पहिल्या तीन षटकांतच तंबूत परत पाठवलं आहे. पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज शाहीन आफ्रिदी याने भारताचे रोहित शर्मा आणि के एल राहुल यांची विकेट घेतली आहे.

भारताच्या पहिल्या तीन षटकांत दोन गडी तंबूत

शाहीनने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूत भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचा बळी घेतला. त्याने रोहितला पायचित पकडलं. त्यामुळे स्टेडियअममध्ये भारतीय चाहत्यांमध्ये शांततेचं वातावरण बघायला मिळालं. रोहित शर्मा बाद झाल्याने भारतीय संघावर दबाव निर्माण झाला. रोहित नंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने खमकेपणाने फलंदाजी करायला सुरुवात केली. पण तिसऱ्या षटकात पुन्हा घात झाला. कारण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने सलामीवीर के एल राहुलचा त्रिफळा उडाला. त्यामुळे भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाकडून मैदानात आनंद साजरा करण्यात आला.

भारतीय संघात आतापर्यंत कुणाच्या किती धावा?

भारतीय संघाची आजची सुरुवातच खराब झाली. भारताचा मातब्बर खेळाडू सलामीवीर रोहित शर्मा आज पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ के एल राहुल हा क्लिन बोल्ड झाला. दोघांना पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने आऊट केलं. त्यानंतर मैदानावर कर्णधार विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सूर्यकुमार चांगल्याच जोशमध्ये आला होता. त्याने एक चौकार आणि षटकार लगावला. पण सूर्यकुमार अखेर पाकिस्तानच्या हसन अलीच्या बोलवर झेलबाद झाला. रिझवानने त्याचा झेल टिपला आणि भारताचा तिसरा गडी तंबूत परतला. सूर्यकुमारने 8 चेडूत 11 धावा केल्या. त्यानंतर भारताचा तरुण तडफदार खेळाडू ऋषभ पंत विराटला साथ देण्यासाठी मैदानावर दाखल झाला.

अशी आहे भारताची अंतिम 11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा,  भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तानचे अंतिम 11

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.

भारत-पाकिस्तानचे सर्वात मोठे चाहते दुबईत दाखल

स्टेडियममध्ये क्रिकेट फॅन्स नसतील तर सामन्यांमध्ये फारशी मजा येत नाही. चाहते या खेळाचा अविभाज्य भाग आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जगभरात बहुतांश क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. आता जगभरातील परिस्थिती सुधारतेय. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारताची पडझड सुरुच, तिसरा गडी सूर्यकुमार यादवही बाद

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.