AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: ‘टीम इंडिया डरपोकसारखी खेळते’, वर्ल्ड कपआधी इंग्लंडच्या माजी कॅप्टनने डिवचलं

T20 World Cup: असं विधान करुन इंग्लंडच्या माजी कॅप्टनने वादाची ठिणगी टाकली आहे

T20 World Cup: 'टीम इंडिया डरपोकसारखी खेळते', वर्ल्ड कपआधी इंग्लंडच्या माजी कॅप्टनने डिवचलं
Team indiaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 14, 2022 | 4:43 PM
Share

मुंबई: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियामध्ये (Team india in Australia) आहे. लवकरच तिथे टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) स्पर्धा सुरु होणार आहे. टीम इंडियाचे सध्या सराव सामने सुरु आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ही मॅच मेलबर्न येथे होईल. या मॅचआधी इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (nasser hussain) याने टीम इंडियाबद्दल एक वादग्रस्त विधान केलय.

त्यामुळेच त्यांच सर्वात जास्त नुकसान

नासिर हुसैनच्या मते, “टीम इंडियाकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांनी अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. पण वर्ल्ड कपसारख्या आयसीसी टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा डरपोकपणा दिसून येतो. टीम इंडिया डरपोक सारखी खेळते. त्यामुळेच त्यांच सर्वात जास्त नुकसान होतं”

आशिया कपमध्ये निराशा

मागच्या काही वर्षात टीम इंडियाने चांगलं क्रिकेट खेळलय. खासकरुन 2022 मध्ये. पण अलीकडेच झालेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने निराशाजनक प्रदर्शन केलं. टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली नाही. श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून आशिया कपच जेतेपद मिळवलं.

हे सुद्धा सत्य

“ICC इवेंटसमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल काही मुद्दे आहेत. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांना ते रोटेट करतात. आराम देतात. टीम इंडियाने सर्वच टीम्सना हरवलं आहे. पण वर्ल्ड इवेंट म्हणजे मोठ्या स्पर्धेत ते डरपोकसारखा गेम खेळतात, हे सुद्धा सत्य आहे” असं नासिर हुसैन स्काय स्पोर्ट्सवर म्हणाला.

पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध

मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच ग्रुप स्टेजमध्येच आव्हान संपुष्टात आलं होतं. टीम इंडियाने 1983 साली वर्ल्ड कप, त्यानंतर 2007 मध्ये टी 20 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकलाय. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. पुढच्या आठवड्यापासून टी 20 वर्ल्ड कप सुरु होतोय. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्ंटोबरला होणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.