AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: ‘टीम इंडिया डरपोकसारखी खेळते’, वर्ल्ड कपआधी इंग्लंडच्या माजी कॅप्टनने डिवचलं

T20 World Cup: असं विधान करुन इंग्लंडच्या माजी कॅप्टनने वादाची ठिणगी टाकली आहे

T20 World Cup: 'टीम इंडिया डरपोकसारखी खेळते', वर्ल्ड कपआधी इंग्लंडच्या माजी कॅप्टनने डिवचलं
Team indiaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 14, 2022 | 4:43 PM
Share

मुंबई: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियामध्ये (Team india in Australia) आहे. लवकरच तिथे टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) स्पर्धा सुरु होणार आहे. टीम इंडियाचे सध्या सराव सामने सुरु आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ही मॅच मेलबर्न येथे होईल. या मॅचआधी इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (nasser hussain) याने टीम इंडियाबद्दल एक वादग्रस्त विधान केलय.

त्यामुळेच त्यांच सर्वात जास्त नुकसान

नासिर हुसैनच्या मते, “टीम इंडियाकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांनी अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. पण वर्ल्ड कपसारख्या आयसीसी टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा डरपोकपणा दिसून येतो. टीम इंडिया डरपोक सारखी खेळते. त्यामुळेच त्यांच सर्वात जास्त नुकसान होतं”

आशिया कपमध्ये निराशा

मागच्या काही वर्षात टीम इंडियाने चांगलं क्रिकेट खेळलय. खासकरुन 2022 मध्ये. पण अलीकडेच झालेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने निराशाजनक प्रदर्शन केलं. टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली नाही. श्रीलंकेने पाकिस्तानला हरवून आशिया कपच जेतेपद मिळवलं.

हे सुद्धा सत्य

“ICC इवेंटसमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल काही मुद्दे आहेत. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यांना ते रोटेट करतात. आराम देतात. टीम इंडियाने सर्वच टीम्सना हरवलं आहे. पण वर्ल्ड इवेंट म्हणजे मोठ्या स्पर्धेत ते डरपोकसारखा गेम खेळतात, हे सुद्धा सत्य आहे” असं नासिर हुसैन स्काय स्पोर्ट्सवर म्हणाला.

पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध

मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच ग्रुप स्टेजमध्येच आव्हान संपुष्टात आलं होतं. टीम इंडियाने 1983 साली वर्ल्ड कप, त्यानंतर 2007 मध्ये टी 20 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकलाय. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. पुढच्या आठवड्यापासून टी 20 वर्ल्ड कप सुरु होतोय. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्ंटोबरला होणार आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.