Ind vs eng : रोहित जिंकलंस भावा, सेमी फायनल जिंकल्यावर कपिल देव हिटमॅनबद्दल मोजकंच पण खरं बोलले…
Kapil Dev on Rohit sharma : टी-20 वर्ल्ड कपमधये सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाचा आतातरी वर्ल्ड कपचा दुष्काळ संपणार की नाही याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. इंग्लंडविरूद्ध मिळवलेल्या विजयानंतर आजी-माजी खेळाडूंनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा आपल्या नेतृत्त्वात टीम इंडियाला पुढे घेऊन जात आहे. अशातच टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी रोहितचं मोजक्या शब्दात पण भरभरून कौतुक केलं आहे.

टीम इंडियाला पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या टीमचे कर्णधार कपिल देव यांनी भरभरून यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील सेमी फायनलमध्ये इंग्लंडला पराभूत केल्यावर कपिल देव यांनी संपूर्ण टीमसह रोहित शर्मा याचं कौतुक केलंय.

टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली यावरून दिसून येतं की चांगलं प्रदर्शन होत असून टीममधील प्रत्येक खेळाडू विजयामध्ये आपलं योगदान देत आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाची कामगिरी उत्तम राहिली असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे.

टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 171-7 धावांचे आव्हान दिले होते. यामध्ये रोहित शर्माने 57 धावांची झंझावती खेळी केली होती. तर त्याला सुर्यकुमार यादव यानही योग्य साथ देत 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

टीम इंडियाच्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 103-10 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या.

टीम इंडियाचा फायनलमध्ये सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत असून दोन्ही संघांची आतापर्यंत दमदार कामगिरी राहिली आहे. फायनल सामना उद्या म्हणजेच 29 जूनला होणार आहे.