T20 World Cup 2026: ICC चो नियम, टीम इंडियाला मोठी लॉटरी, सामना न खेळता उपांत्य फेरीत धडकणार?

T20 World Cup 2026: टी20 विश्वकप सामन्यावेळी पावसाच्या भीतीने अनेक संघांची झोप उडवली आहे. अर्थात ICC ने टुर्नामेंटमध्ये खेळण्याविषयी सुपर-8 मधील विविध फेऱ्यातसंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. त्याचा भारताला फायदा मिळू शकतो.

T20 World Cup 2026: ICC चो नियम, टीम इंडियाला मोठी लॉटरी, सामना न खेळता उपांत्य फेरीत धडकणार?
T20 World Cup 2026
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Feb 22, 2026 | 11:50 AM

T20 World Cup 2026: आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 ची फेरी सुरू झाली आहे. भारत गट-1 मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉब्वे हे देश आहेत. भारताचा पहिला सुपर-8 सामना आज दक्षिण आफ्रिकेविरोधात अहमदाबाद येथे खेळला जाईल. सुपर-8 मध्ये कोणतेही पॉईंट कॅरीओव्हर नाही. सर्वच संघाची शुन्यापासून सुरूवात होणार आहे. प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. तर टॉप-2 सेमीफायनलमध्ये येईल. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना 1 गुण मिळेल. याशिवाय ICC ने टुर्नामेंटमध्ये खेळण्यासंबंधी काही अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत.

पावसामुळे सर्वच संघाची वाढली चिंता

सुपर-8 मधील पहिला सामना पावसामुळे खेळता आला नाही. त्याआधारे पाकिस्तान आणि न्युझिलंड संघाला प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. तर सुपर-8 मध्ये कोणत्याही गटातील सामना पावसामुळे अथवा इतर कारणामुळे जर रद्द झाला तर काय होईल? ICC ने टुर्नामेंटमध्ये खेळण्याविषयी सुपर-8 मधील विविध फेऱ्यातसंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. त्याचा भारताला फायदा होऊ शकतो. भारताला थेट उपांत्य फेरीत धडक देता येऊ शकते.

विना सामना उपांत्य फेरीत टीम इंडियाची धडक?

ICC च्या नियमानुसार, सेमी फायनलमध्ये पोहचण्याचा निर्णय हा सर्वात आधी गुणतालिकेनुसार होईल. आघाडीचे दोन संघाला उपांत्य फेरीत जागा मिळेल. तर दोन्ही संघाचे गुण सारखे झाले तर सुपर-8 फेरीत सर्वाधिक सामने जिंकणारा संघ आघाडीवर असेल. पण सामन्यांची संख्या समान असेल तर नेट रन रेट नुसार निर्णय घेण्यात येईल. जर नेट रन रेट सुद्धा समान आले तर दोन्ही संघादरम्यान सामना खेळवल्या जाईल. त्याआधारे संघ निर्णय होईल.

पण जर गट-1 मधील सर्व सामने वॉशआउट झाले ,तर चारही संघाला 3-3 गुण समान पद्धतीने देण्यात येईल. त्यानंतर नेट रन-रेट लागू होईल. पण जेव्हा कोणताही सामना खेळला जाणार नाही तेव्हा NRR पण 0 असेल. हेड-टू हेड पण होणार नाही. शेवटचा पर्याय म्हणून टाय ब्रेकर होईल. त्याआधारे ICC T20I रॅकिंग होईल. सध्या भारत हा T20I रँकिंगमध्ये सर्वोच्च क्रमांकावर आहे. त्यामुळे कोणताही सामना न खेळता भारत उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आहे.