AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle: आशा भोसले यांचं संघर्षमयी खासगी जीवन; वयाच्या 47 व्या वर्षी मिळालं दुसरं प्रेम

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई यांचं खासगी आयुष्य मात्र संघर्षमयी होतं. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं.

Asha Bhosle: आशा भोसले यांचं संघर्षमयी खासगी जीवन; वयाच्या 47 व्या वर्षी मिळालं दुसरं प्रेम
Asha BhosleImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 12, 2026 | 1:58 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा भोसले यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आशा भोसले यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आठ दशकांहून अधिक काळापासून त्या संगीत क्षेत्रात कार्यरत होत्या. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी स्टेजवर लाइव्ह गाऊन सर्वांनाच थक्क केलं होतं. आपल्या करिअरमध्ये 12 हजारांहून अधिक गाणं गायलेल्या आशा भोसले या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत होत्या.

1933 मध्ये महाराष्ट्रातील सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले या गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या होत्या. त्या नऊ वर्षांच्या असतानाच वडिलांचं निधन झाल्याने मोठी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी घरातून पळून जाऊन गणपतराव भोसले यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यांचं हे नातं कुटुंब आणि बहीण लता मंगेशकर यांना मंजूर नव्हतं. त्यावेळी आशा भोसले फक्त 16 वर्षांच्या तर गणपतराव हे 31 वर्षांचे होते. या लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांचा संसार मोडला.

आशा भोसले यांना त्यांच्या सासरच्या मंडळींकडून खूप वाईट वागणूक मिळाली. त्यांना मारहाण आणि घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागलं होतं. या जाचाला कंटाळून अखेर एकेदिवशी त्यांनी मुलांना सोबत घेऊन पतीचं घर सोडलं. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. एकीकडे गणपतराव यांच्याशी लग्नामुळे त्यांच्या घरच्यांनी बोलणं बंद केलं होतं, तर दुसरीकडे सासरी त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. आयुष्याच्या या कठीण काळात आशा भोसले यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांना आधार दिला होता. माहेरी परतून त्यांनी मुलांची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

आशा भोसले यांना पहिल्या लग्नातून तीन मुलं आहेत- हेमंत, वर्षा आणि आनंद भोसले. हेमंत हे संगीतकार होते आणि 2015 मध्ये कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. तेव्हा ते 66 वर्षांचे होते. तर कन्या वर्षा भोसले या पत्रकार होत्या. 2012 मध्ये त्यांनी आत्महत्या केली होती. वर्षा यांनी हेमंत केंकरे यांच्याशी लग्न केलं होतं, परंतु लग्नाच्या काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर वर्षा या आई आशा भोसले यांच्यासोबतच राहू लागल्या होत्या. नैराश्यात गेल्यानंतर त्यांनी एकेदिवशी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली होती.

पहिला संसार मोडल्यानंतर आशा भोसले या जवळपास 20 वर्षे एकट्याच राहिल्या होत्या. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं. प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. आर. डी. बर्मन यांचंही हे दुसरं लग्न होतं आणि आशा भोसले यांच्यापेक्षा ते वयाने सहा वर्षांनी लहान होते. या दोघांनी मिळून फिल्म इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....