AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taarak Mehta : ‘तारक मेहता..’मध्ये मोठा बदल, नव्या अभिनेत्यामुळे जेठालालचं मोठं नुकसान?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत येत्या काही दिवसांत मोठा बदल होणार आहे. यामुळे जेठालालची भूमिका साकारणारे आणि मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते दिलीप जोशी यांचं मोठं नुकसान होणार आहे.

Taarak Mehta : 'तारक मेहता..'मध्ये मोठा बदल, नव्या अभिनेत्यामुळे जेठालालचं मोठं नुकसान?
Dilip JoshiImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 13, 2026 | 9:40 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र जेठालालची भूमिका विशेष प्रसिद्ध आहे. अभिनेते दिलीप जोशी गेल्या अनेक वर्षांपासून मालिकेत ही भूमिका साकारत आहेत. विनोदाची अचूक टायमिंग, त्यांचे हावभाव, डायलॉग बोलण्याची पद्धत.. याबाबतीत ते मोठमोठ्या कलाकारांनाही मागे टाकतात. म्हणूनच ‘जेठालाल’ म्हणून त्यांना फक्त भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मात्र आता जेठालालच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काळात निर्माते मालिकेतील जेठालालचा ट्रॅक कमी करण्याचा विचार करत आहेत.

‘तारक मेहता..’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच एक नवीन कुटुंब आलं आहे. हे राजस्थानी कुटुंब असून त्यात चार सदस्य आहेत. पती, पत्नी आणि दोन मुलं. अभिनेते कुलदिप गौर या मालिकेत रतन सिंह बिंजोलाची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेत्री धरती भट्ट ही रतनची पत्नी रुपाच्या भूमिकेत आहे. या दोघांना वीर हा मुलगा आणि बंसरी ही मुलगी आहे. आता निर्माते या कुटुंबाच्या कथेवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं कळतंय.

मालिकेत नव्या अभिनेत्याची एण्ट्री-

View this post on Instagram

A post shared by Kuldeep Gor (@cooldeepg)

जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे महिन्यातून पंधरा दिवस शूटिंग करतात आणि सर्वाधिक मानधनसुद्धा घेतात. त्यामुळे निर्माते रतन सिंह बिंजोलाच्या कुटुंबावर जास्त फोकत ठेवून कथा दाखवण्याचा प्लॅन करत आहेत. जेव्हापासून मालिकेत हे नवीन कुटुंब आलं आहे, तेव्हापासून निर्माते सर्वाधिक कथा त्यांचीच दाखवत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मालिकेत जेठालालचा ट्रॅक दाखवण्यातच आला नाहीये. आधी काही दिवस बाघा आणि बावरीच्या प्रेमकथेवरचा ट्रॅक पहायला मिळत होता. तेव्हासुद्धा जेठालाल मालिकेत कमीच दिसले.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15-16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जेठालाल हे या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय पात्र आहे. या पात्राबद्दल काही विशेष निर्णय घेण्यात आला का, याविषयी अद्याप निर्मात्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तर अभिनेते दिलीप जोशीसुद्धा याबद्दल व्यक्त झाले नाहीत. त्यामुळे येत्या काळात या मालिकेत नेमके कोणते बदल होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश