AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill: मालिका जिंकल्यानंतरही गिलच्या मनात एक खंत कायम, सामन्यानंतर ‘ती’ एक भीती बोलून दाखवली

IND vs SL Test Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका पार पडली, जी भारतीय संघाने जिंकली, आता यानंतरही कर्णधार गिलने आपली खंत बोलून दाखवली आहे.

Shubman Gill: मालिका जिंकल्यानंतरही गिलच्या मनात एक खंत कायम, सामन्यानंतर 'ती' एक भीती बोलून दाखवली
| Updated on: Aug 28, 2026 | 8:04 AM
Share

IND vs SL: कोलंबो येथे दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवला. पहिल्या डावात ५०३ धावांचा डोंगर उभा करून श्रीलंकेला फॉलो-ऑन देण्यास भाग पाडले असले तरी, यजमान संघाच्या फलंदाजांच्या झुंजार कामगिरीमुळे भारताला विजय मिळवता आला नाही. या रोमांचक अनिर्णित सामन्यानंतर आणि मालिका विजयानंतर, भारतीय कर्णधार शुभमन गिलने प्रतिस्पर्धी संघाच्या जिद्दीचे कौतुक केले आणि आपल्या युवा संघाच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.

सामन्यानंतर शुभमन गिल काय म्हणाला?

सामन्यानंतर, हा निकाल मिळवण्यासाठी भारतीय संघ काही वेगळे करू शकला असता का, असे विचारले असता गिल म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, काहीही नाही. आम्ही सलग तीन दिवस जवळपास २५० षटके क्षेत्ररक्षण केले आणि आमच्याकडून जे शक्य होते ते सर्व केले. श्रीलंकेने उत्कृष्ट खेळ केला. त्यांचे फलंदाज खूप चांगले खेळले. त्यांच्याकडे प्रतिभा होती आणि थोडे नशीबही होते. त्यामुळे, मला नाही वाटत की आम्ही काही वेगळे करू शकलो असतो.”

१-० ने मालिका जिंकल्यानंतर, कर्णधार गिलने संघाच्या एकूण कामगिरीचे मूल्यांकन करताना, प्रतिस्पर्धी संघाकडून शिकण्याबद्दल सांगितले. तो म्हणाला, “या मालिकेतून, अगदी प्रतिस्पर्धी संघाकडूनही, आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या. त्यांच्यावर असलेला दबाव आणि ज्या प्रकारे त्यांनी पुनरागमन केले ते पाहणे आश्चर्यकारक होते. जेवणाच्या आणि चहापानाच्या वेळीही, आम्ही यावर बोलत होतो की आम्ही यापेक्षा वेगळे काहीही करू शकलो नसतो. पडिक्कल संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट खेळला, केएल राहुल अप्रतिम होता, मानव सुथारने अपवादात्मक गोलंदाजी केली आणि प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही डावांमध्ये कठोर परिश्रम घेतले. आमच्या गोलंदाजांनी आपले सर्वस्व दिले.” त्यामुळे संपूर्ण सामन्यात श्रीलंकेचा खेळ पाहून गिलच्या मनात भीती निर्माण झाली हे स्पष्टपणे कळते.

शुभमन गिल म्हणाला, “हा आमच्यासाठी खूप रोमांचक काळ आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर, आमच्या तयारीमध्ये आणि कामगिरीमध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. आतापर्यंतच्या या प्रवासात आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत.”

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश