AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flood: नेपाळचा आडमुठेपणा काही कमी होईना, भारताची मदत नाकारली, असं का?

Nepal Flash Flood: नेपाळमध्ये भीषण पूर आल्याने जनजीवन विस्कळीत आले आहे. नेपाळमधील परिस्थितीमुळे भारताने नेपाळला मदत पाठावयची असा निर्णय घेतला, पण नेपाळच्या एका निर्णयामुळे ते शक्य होऊ शकत नाही.

Nepal Flood: नेपाळचा आडमुठेपणा काही कमी होईना, भारताची मदत नाकारली, असं का?
| Updated on: Aug 28, 2026 | 7:42 AM
Share

Nepal Flood:  परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारताने आतापर्यंत नेपाळला ४७.५ टन मदतीला येईल इतके साहित्य पाठवले आहे. भारताने बेली ब्रिज आणि प्रीफॅब ट्रस ब्रिज देण्याचीही तयारी दर्शवली आहे. नेपाळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारत आपली एनडीआरएफ (NDRF) पथके पाठवण्याचा विचार करत आहे.

नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळ हादरले आहे. शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून १५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, नेपाळ सरकारने बचाव पथके पाठवण्याचा भारताचा प्रस्ताव फेटाळला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, नेपाळचे स्वतःचे सुरक्षा दल मदत आणि बचाव कार्य करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. ‘काठमांडू पोस्ट’मधील एका वृत्तानुसार, नेपाळने म्हटले आहे की त्यांना सध्या बचत पथकांऐवजी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, भारत, चीन, अमेरिका, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि बांगलादेश यांसारख्या देशांनी नेपाळमध्ये आपली तज्ज्ञ आपत्ती निवारण पथके पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. भारताने आपले एनडीआरएफ (NDRF) पथक तैनात करण्याची तयारी दर्शवली होती. नेपाळी लष्कर आणि पोलिसांच्या शिफारशीनुसार, सरकारने हे सर्व प्रस्ताव फेटाळले. सरकारचा असा विश्वास आहे की, २०१५ च्या विनाशकारी भूकंपादरम्यान मोठ्या संख्येने आलेल्या परदेशी पथकांमुळे समन्वय आणि व्यवस्थापनात मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या.

नेपाळ पोलीस आणि विविध दूतावासांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या इतर देशांच्या नागरिकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अचूक माहिती देण्यासाठी, नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक आपत्कालीन प्रतिसाद पथक तयार केले आहे. तिमुरे, रसुवा येथील भू-कार्यवाही पथकामध्ये उपसचिव स्तरावरील एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक सुरक्षा दलांशी थेट समन्वय साधेल आणि बेपत्ता लोकांबद्दलची माहिती दूतावास आणि कुटुंबीयांना देईल. परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी सर्व संबंधित विभागांना इतर सरकारांशी सतत संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत.

नेपाळने परदेशी सैन्य किंवा बचाव पथकांसाठी नकार दिला असला तरी, आर्थिक मदत नाकारली नाही. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारताने आतापर्यंत नेपाळला ४७.५ टन मदतीला येईल असे साहित्य पाठवले आहे. याव्यतिरिक्त, भारताने बेली ब्रिज आणि प्रीफॅब ट्रस ब्रिज देण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

भारताव्यतिरिक्त, अमेरिका, ब्रिटन आणि जागतिक बँकेने यापूर्वीच आर्थिक मदतीची घोषणा केली आहे, आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासातो कांडा यांनी नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांच्याशी संवाद साधला आणि पुनर्रचना तसेच पूर्वसूचना प्रणाली मजबूत करण्यासाठी सहकार्याने आश्वासन दिले, नेपाळी दूतवासांना कोणतीही आर्थिक मदत केवळ पंतप्रधानांच्या मदत निधीमार्फतच स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश