Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकारकडून मनधरणी
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. अमराठी रिक्षाचालकांना मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत दिली.

LIVE NEWS & UPDATES
-
पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कुल उपक्रमातून शाळांचा होणार कायापालट
पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कुल उपक्रमातून शाळांचा कायापालट होणार आहे. सोयी सुविधांपासून दूर राहिलेल्या आणखी 300 शाळांना नव्या रूपात आणण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन 300 जुनी शाळा नवी ओळख हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आलाा आहे. ग्रामीण भागातील वीस हजार विद्यार्थ्यांना सुरक्षित सुसज्ज आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमातून जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. गरजू शाळांसाठी हा उपक्रम असल्याची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती दि
-
वडेट्टीवार मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावतायत
वडेट्टीवार मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावतायत असा आरोप महेश डोंगरे पाटील यांनी केला आहे. वडेट्टीवार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा. मराठा क्रांती मोर्चाने मागणी केली आहे. लक्ष्मण हाके, वाघमारे यांना वडेट्टीवार रसद पुरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अन्यथा वडेट्टीवारांच्या मतदारसंघात जाऊन जाब विचारू अस इशारा पाटील यांनी दिला.
-
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर अंतरवाली सराटीत तयारीला वेग आला आहे. निर्णायक आंदोलनासाठी ते सज्ज झाले आहेत. अंतरवालीत मंडप तयार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सरकार जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. MPSC च्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्यानंतर त्यातील सुरस कथा समोर आल्या. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मार्किंग पॅटर्न फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे. आज रक्षाबंधन आहे. सीमेवर आणि राजकीय रक्षाबंधन दिसेल.
मुंबई महापालिकेवर शिंदे सेनेचा महापौर बसण्याची चर्चा समोर आली आहे. याविषयीचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. गणेश मंडळांना बाप्पााच्या मूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागणार आहे. तर डीजेच्या परवानगीवरूनही कार्यकर्त्यांना यंदा कसरत करावी लागणार असल्याचे दिसते. नेपाळमध्ये महाप्रलय आल्याने जनजीवन उद्धवस्त झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांना राज्यात आणण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथं वाचू शकता.
Published On - Aug 28,2026 7:29 AM
