
टीम इंडियाने मायदेशात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजवर मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजवर स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात जबरदस्त असा विजय मिळवला. भारताने 196 धावांचं आव्हान हे 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. संजू सॅमसन या भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूने नॉट आऊट 97 रन्स करुन भारताला विजयी केलं. संजूला या विजयासाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच या सामन्यानंतर सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं.
टीम इंडियाने विंडीजला पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यातून स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचणारी चौथी टीम ठरणार होती. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा होता. विंडीजने भारतासमोर 196 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात धावांचा पाठलाग करताना कशी कामगिरी करते याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून होतं. मात्र संजू सॅमसन याने इतर 5 सहकाऱ्यांच्या मदतीने धमाका केला आणि भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.
टीम इंडियाआधी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. तर टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये पोहचताच त्यांचा इंग्लंड विरुद्ध सामना होणार यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे एक पोस्ट करण्यात आली आहे.
इंग्लंडने 1 फेब्रुवारीला रात्री 10 वाजून 59 मिनिटांनी ही पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. confirmed असं या फोटोवर पाहायला मिळत आहे. आपण उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहोत, असं या पोस्टमध्ये म्हटलंय आहे.
इंग्लंडची एक्स पोस्ट
World Cup semi-final 🏆
Against India in Mumbai 🏏
At the Wankhede 🏟
A MASSIVE match awaits… pic.twitter.com/VGFTHMInoH
— England Cricket (@englandcricket) March 1, 2026
इंग्लंडकडून या पोस्टमध्ये उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.