AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Mishra चा शुबमनवर कॅप्टन्सीवरुन हल्लाबोल, म्हणाला तो कर्णधार म्हणून लायक…” व्हीडिओ व्हायरल

Amit Mishra on Shubhman Gill Captaincy: शुबमन गिल याने झिंबाब्वे दौऱ्यात टीम इंडियाला 5 सामन्यांच्या टी20i मालिकेत आपल्या नेतृत्वात 4-1 ने विजय मिळवून दिला.

Amit Mishra चा शुबमनवर कॅप्टन्सीवरुन हल्लाबोल, म्हणाला तो कर्णधार म्हणून लायक... व्हीडिओ व्हायरल
Amit Mishra and Shubhman Gill
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 16, 2024 | 12:20 AM
Share

शुबमन गिल याने झिंबाब्वे दौऱ्यात अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजय मिळवून दिला. शुबमन गिल याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 4-1 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकून दिली. टीम इंडियाला यजमान झिंबाब्वेकडून पहिल्या टी 20 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे शुबमनला कॅप्टन म्हणून काहीशी टीका सहन करावी लागली. मात्र त्यानंतर शुबमन आणि युवा ब्रिगेडने सलग 4 सामने जिंकत ताकद दाखवून दिली. शुबमनच्या कर्णधाल म्हणून या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा शुबमन गिल याच्या नेतृत्वाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

अमिता मिश्रा काय म्हणाला?

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर मुख्य आणि अनुभवी खेळाडूंना विश्रांत देण्यात आली. तर युवा ब्रिगेडला झिंबाब्वे दौऱ्यासाठी संधी दिली गेली. टी 20 मालिकेत कॅप्टन्सीची संधी शुबमन गिल याला देण्यात आली. एका युट्युबरने घेतलेल्या मुलाखतीत अमित मिश्राला शुबमनला कॅप्टन्सी देण्यावरुन प्रश्न केला. यावरुन अमित मिश्रा म्हणाला की,”मला नाही वाटत की त्याला कॅप्टन करायला हवा. मी असतो तर त्याला कॅप्टन्सी दिली नसती. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिलं आहे. कॅप्टन्सी कशी करायची हे त्याला माहितच नाही. त्याच्याकडे कोणतीही आयडिया नाही.”

शुबमन गिल याने 2019-2020 च्या दिलीप ट्रॉफी स्पर्धेत आपल्या संघाच नेतृत्व केलं होतं. शुबमन गिल याच्या काही सामन्यांचा अपवाद वगळता त्याला नेृतत्वाचा फारसा अनुभव नाही. आयपीएलच्या 17 व्या मोसमात (IPL 2024) मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सच्या हार्दिकला आपल्या ताफ्यात घेत कॅप्टन केलं. त्यामुळे गुजरातच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमनला मिळाली. मात्र शुबमनच्या नेतृत्वात गुजरात टीम आठव्या स्थानी राहिली. यावरूनही अमित मिश्राने शुबमनवर निशाणा साधला. “टीम इंडियात कुणाला कॅप्टन करा, असं व्हायला नको”, असं अमितने म्हटलं.

अमित मिश्राचा शुबमनच्या नेतृत्वावर निशाणा

“शुबमनकडे नाईलाजाने कर्णधारपदाची सूत्र”

अमित मिश्रा इतक्यावरच थांबला नाही. त्याने शुबमनला आयपीएलमध्ये कदाचित नाईलाजाने कॅप्टन केलं असल्याचा खुलासाही केला. हार्दिक अखेरच्या क्षणी मुंबईत गेल्याने शुबमनला गुजरातचं कॅप्टन करण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमितने म्हटलं.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?