AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडला गुंडाळलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवींचा डाव आटोपला आहे. या सामन्यामध्ये मोहम्मद शमी याने अर्धा संघ माघारी पाठवला. आता भारत हे लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IND vs NZ : टीम इंडियाने न्यूझीलंडला गुंडाळलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान
| Updated on: Oct 22, 2023 | 6:59 PM
Share

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने किंवींना फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाचा डाव 273 धावांवर आटोपला. भारताच्या गोलंदाजांनी शेवटला दमदार कमबॅक करत किंवींना 300 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही. न्यूझीलंड संघाकडून डॅरिल मिशेल याने नाबाद शतकी खेळी केली. तर भारताकडून आज पहिलाच सामना खेळत असलेल्या मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहेत.

बांगलादेशचा डाव

न्यूझीलंड संघाची खराब सुरूवात झाली होती, ओपनर डेव्हॉन कॉनवे याला मोहम्मद सिराजने शून्यावर माघारी पाठवलं. पाठोपाठ विल यंगला 17 धावांवर शमीने बोल्ड केलं. त्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरिल मिशेल यांनी मजबूत भागीदारी केली. दोघांनीही यश मिळवनू दिलं नाही आणि धावसंख्येची गतीही वाढवली.

मोहम्मद शमी याने ही जोडी फोडत रचिन रवींद्र याला 75 धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर किवींचा डाव गडगडला. शेवटच्या दहा ओव्हरमध्ये न्यूझीलंड संघाच्या 6 विकेट गेल्या, मोहम्मद शमी याने पंजा पूर्ण केला. तर न्यूझीलंड संघाचा डॅरिल मिशेल याने शतकी खेळी करत एक बाजू लावून धरली होती. डॅरिल मिशेल मोठा फटका मारण्याच्या नादात १३० धावांवर आऊट झाला. मिशेल या खेळीमध्ये ९ चौकार आणि ५ षटकार मारले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.