AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नवी जर्सी लाँच, टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही?

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना बीसीसीआयने नवी जर्सी लाँच केली आहे. टीम इंडिया फेब्रुवारी-मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीत उतरणार आहे. भारतीय संघाची ही जर्सी जर्मन स्पोर्टवियर कंपनी एडिडासने बनवली आहे. मागच्या वर्षीच टीम इंडियाचा किट स्पॉन्सर म्हणून मोहोर लागली होती.

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नवी जर्सी लाँच, टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही?
| Updated on: Nov 29, 2024 | 8:02 PM
Share

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर पिंक कसोटीसाठी जोरदार तयारी सुरु आहे.दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. त्यावरून जोरदार रणकंदन सुरु आहे. भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ही स्पर्धा कशी होणार यावरून चर्चांचे फड रंगले आहेत. असं असताना बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच केली आहे. ही जर्सी वनडेसाठी असणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मुंबईच्या कार्यालयात या जर्सीचं अनावरण केलं. यावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर उपस्थित होती. टीम इंडियाची ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्टवियर कंपनी एडिडासने तयार केली आहे. टीम इंडियाची मागची जर्सी पूर्ण निळी होती आणि खांद्यावर एडिडासच्या तीन पट्ट्या होत्या. वर्ल्डकप दरम्यान या पट्ट्यांना तिरंगी रंग देण्यात आला होता. यावेळेसही खांद्यावर एडिडासची तीन पट्ट्या आहेत. या पट्ट्यांना पांढरा रंग आहे पण त्याच्या मागे तिरंगी शेड आहे. तसेच निळा रंग थोडा मागच्या जर्सीपेक्षा लाईट आहे. पण खाकेत डार्क निळा रंग आहे.

ही जर्सी पुरूष संघ आणि महिला संघही घालणार आहे. महिला संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत महिला संघ पहिल्यांदाच नवी जर्सी घालणार आहे. दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 15 डिसेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत होणार आहेत.

भारतीय पुरुष संघ जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा जर्सी परिधान करणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही जर्सी परिधान करणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ हीच जर्सी परिधान करणार आहे. पुढील वर्षी भारतात महिला वनडे वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया याच जर्सीत दिसेल.

Follow Us
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद