AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझिलंड विरोधात मालिका गमावली; नाराज BCCI चा कॅप्टन रोहित शर्माला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेपूर्वी मोठा निर्णय

सध्या टीम इंडिया आणि न्यूझिलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.

न्यूझिलंड विरोधात मालिका गमावली; नाराज BCCI चा कॅप्टन रोहित शर्माला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेपूर्वी मोठा निर्णय
| Updated on: Nov 01, 2024 | 3:47 PM
Share

भारतानं न्यूझिलंड विरोधातील कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझिलंडविरोधात तीन कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा दोन समान्यात यापूर्वीच पराभव झाला आहे. सध्या टीम इंडिया आणि न्यूझिलंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. न्यूझिलंडविरोधातील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर पाच नोव्हेंबरनंतर टीम इंडिया कधीही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होवू शकते. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ऑस्ट्रोलिया दौऱ्यामधील टीम इंडियाचा एक सामना रद्द झाला आहे.

22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय टीम इंडिया एच्या विरोधात एक वॉर्म अप मॅच खेळणार होती. हा सामना बीसीसीआयनं रद्द केला आहे. इंडिया ए च्या विरोधात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणारा वॉर्म अप सामना देखील पर्थच्याच मैदानात होणार आहे. जिथे भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं जोरदार तयारी केली आहे.बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाकडून आपसात खेळण्याचा प्लॅन बनवण्यात आला होता. मात्र टीम इंडियानं न्यूझिलंडविरोधात कसोटी मालिका गमावली आहे, सलग दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय नाराज असून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी होणारी वॉर्मअप मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.वॉर्म मॅचऐवजी आता खेळाडू नेट प्रॅक्टिसवर भर देणार आहेत.

दरम्यान भारतीय संघानं यापूर्वी आपल्या दोन दौऱ्यांमध्ये वॉर्म अप मॅच खेळली होती. 2018-19 च्या दौऱ्यामध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया XI विरोधात चार दिवसांची वॉर्म अप मॅच खेळली आहे. तर 2020-21 मध्ये देखील वार्म अप सामना खेळवण्यात आला होता. मात्र यावेळी तो रद्द करण्यात आला आहे.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.