AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडियाची पराभवाने सुरुवात, आयुष म्हात्रे-वैभव सूर्यवंशीकडून निराशा, पाकिस्तान 43 धावांनी विजयी

U 19 Asia Cup 2024 IND vs PAK : पाकिस्तानने टीम इंडियावर 44 धावांनी मात करत अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.

IND vs PAK : टीम इंडियाची पराभवाने सुरुवात, आयुष म्हात्रे-वैभव सूर्यवंशीकडून निराशा, पाकिस्तान 43 धावांनी विजयी
u 19 asia cup ind vs pakImage Credit source: Pakistan Cricket X Account
| Updated on: Nov 30, 2024 | 7:13 PM
Share

पाकिस्तान क्रिकेट टीमने अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने टीम इंडियावर 43 धावांनी मात करत महामुकाबला जिंकला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाचा डाव हा 47.1 ओव्हरमध्ये 238 धावांवर आटोपला. पाकिस्तानचा हा टीम इंडिया विरुद्धचा अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील 7 सामन्यांमधील पाचवा विजय ठरला.

टीम इंडियाची बॅटिंग

वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र या दोघांना अपेक्षांवर खरं उतरता आलं नाही. आयुष म्हात्रे 20 धावांवर माघारी परतला. तर वैभव 1 धाव करुन बाद झाला. तसेच बहुतांश फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र निखील कुमार याचा अपवाद वगळता इतर कुणालाही चांगली खेळी करता आली नाही. निखील कुमार याने सर्वाधिक 67 धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस मोहम्मद एनॉन आणि, हरवंश सिंह आणि किरण चोरमले या तिघांनी चिवट खेळी करत भारताच्या पराभवातील अंतर कमी केलं.

मोहम्मद एनॉन आणि, हरवंश सिंह आणि किरण चोरमले या त्रिकुटाने अनुक्रमे 30,26 आणि 20 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 16 धावांच्या पुढे मजल मारता आली नाही. पाकिस्तानकडून अली रझा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अब्दुल सुभान आणि फरहान उल हक या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर उस्मान खान याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

पहिल्या डावात काय झालं?

दरम्यान पाकिस्तानने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून शाहजेब खान आणि उस्मान खान या जोडीने केलेल्या शतकी-अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 281 धावा केल्या. शाहजेब खान याने सर्वाधिक 159 धावा केल्या. तर उस्मान खान याने 60 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या दोघांना आऊट केल्यानंतर पाकिस्तानला झटपट धक्के दिले आणि मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. टीम इंडियाकडून समर्थ नागराज याने 3 विकेट्स घेतल्या. आयुष म्हात्रे याने दोघांना बाद केलं. तर युधजित गुहा आणि किरण चोरमले या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडिया विजयी सुरुवात करण्यात अपयशी

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, हरवंश सिंग (विकेटकीपर), निखिल कुमार, किरण चोरमले, हार्दिक राज, मोहम्मद इनान, समर्थ नागराज आणि युधाजित गुहा.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साद बेग (कर्णधार आणि विकेटकीपर), शाहजेब खान, उस्मान खान, फरहान युसफ, फहम-उल-हक, मोहम्मद रियाजुल्ला, हारून अर्शद, अब्दुल सुभान, अली रझा, उमर झैब आणि नावेद अहमद खान.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.