IND vs SL: टीममधून वगळल्यास चर्चा नको, म्हणून Virat Kohli ने आधीच उचललं ‘हे’ पाऊल

IND vs SL: श्रीलंका सीरीजसाठी आज टीमची घोषणा होणार आहे. मुंबई-दिल्लीचे हे खेळाडू टीममध्ये दिसू शकतात.

IND vs SL: टीममधून वगळल्यास चर्चा नको, म्हणून Virat Kohli ने आधीच उचललं 'हे' पाऊल
Virat kohli-Rohit sharmaImage Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 3:01 PM

मुंबई: नवीन वर्षात 2023 मध्ये टीम इंडियाची पहिली सीरीज श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही टीम्समध्ये तीन T20 आणि तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. या दोन्ही सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होऊ शकते. टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाचा नियमित कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नसल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने टी 20 सीरीजसाठी विश्रांती मागितली आहे. रोहित शर्मा अजूनही पूर्णपणे फिट नाहीय.

विराटने मागितला आराम

सिलेक्शन कमिटीची मंगळवारी बैठक होईल. यावेळी संपूर्ण फोकस रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असेल, क्रिकबजने हे वृत्त दिलय. रोहित शर्मा अजून पूर्णपणे फिट झालेला नाहीय. त्याच्या अंगठ्याची दुखापत लक्षात घेता, त्याला अजून काही दिवस विश्रांतीची गरज आहे. विराट कोहलीने सुद्धा टी 20 सीरीजसाठी आराम मागितला आहे.

हार्दिक पंड्या नेतृत्व करणार

न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाला T20 सीरीजमध्ये विजय मिळवून देणारा हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्ध कर्णधार असेल. या सीरीजपासूनच टी 20 चा कायमस्वरुपी कॅप्टन म्हणून हार्दिकच्या नावाची घोषणा होऊ शकते. रोहित-विराट खेळणार नसल्याने सिलेक्टर्स युवा खेळाडूंना संधी देऊ शकतात. दिल्लीच्या यश ढुलला टीममध्ये संधी मिळू शकते. वनडे सीरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघे खेळताना दिसतील. 2023 मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे खेळाडू वनडे सीरीजमध्ये खेळताना दिसतील.

नामुष्की टाळण्यासाठी विराटने विश्रांती मागितली का?

T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव झाला. तेव्हापासून नेतृत्व आणि टीम बदलाची चर्चा सुरु आहे. वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयने सर्वप्रथम निवड समिती बर्खास्त केली होती. टी 20 च्या दृष्टीने टीम इंडियात अमूलाग्र बदल होऊ शकतात. रोहित आणि विराटच वय लक्षात घेता, पुढच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या खेळण्याबद्दल सांशकता आहे. टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्याची मागणी होत आहे. इशान किशन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ असे टॅलेंटेड खेळाडू संधीच्या प्रतिक्षेत आहेत. टीम जाहीर करताना विराटला वगळल्यास त्यावरुन उलट-सुलट चर्चा होऊ शकते. त्यामुळे आधीच खबरदारी म्हणून विराटने विश्रांती घेतल्याची चर्चा आहे.

भारत-श्रीलंका सीरीजचा कार्यक्रम

तीन मॅचच्या टी 20 सीरीजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. 3 जानेवारीला पहिला सामना खेळला जाईल. दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात आणि तिसरा सामना 7 जानेवारीला सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.