#Virat Kohli: आकडे खोटं बोलणार नाहीत! विराट भारताचाच नाही, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा यशस्वी कॅप्टन

विराटला 2014 मध्ये सर्वप्रथम कर्णधारपदाची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत मध्यावरच एमएस धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले.

#Virat Kohli: आकडे खोटं बोलणार नाहीत! विराट भारताचाच नाही, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा यशस्वी कॅप्टन
Virat Kohli
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 9:10 PM

मुंबई: भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी तडकाफडकी राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काल कसोटी मालिका 2-1 अशी हरल्यानंतर विराटने आज कॅप्टनशिपचा राजीनामा दिला. विराटने याआधी टी-20 ची कॅप्टनशिप सोडली आहे. आता वनडे आणि टी-20 चे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit sharma) आहे. विराटला वनडेच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं. त्यावरुन वाद झाला. कारण विराटला वनडेची कॅप्टनशिप सोडायची नव्हती. पण बीसीसीआयला मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको होते.

विराटला 2014 मध्ये सर्वप्रथम कर्णधारपदाची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत मध्यावरच एमएस धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विराट भारताचा नवा कॅप्टन बनला. त्याने 68 कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले. यात 40 सामन्यात भारत जिंकला. 17 कसोटीत पराभव झाला. एका कठीण परिस्थितीत विराटकडे संघाचे नेतृत्व आले होते. त्याने स्वत:चा खेळ उंचावला व जागतिक क्रिकेटमध्ये एक यशस्वी कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केले.

दौऱ्याच्या मध्यावर धोनीने राजीनामा दिला आणि… ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2014 मध्ये विराट कर्णधार म्हणून पहिला सामना खेळला, तर केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला. कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारताकडे घातक वेगवान गोलंदाजांचा ताफा तयार झाला, जे परदेशातील खेळपट्ट्यांवर 20 विकेट घेऊ शकतात. मागच्या दोन वर्षांपासून कोहलीच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत, आता कर्णधारपदाची जबाबदारी नसल्यामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा विराट धावांच्या राशी उभारेल अशी अपेक्षा आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील चौथा यशस्वी कर्णधार कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (68) सामने खेळले. त्यात (40) लढतींमध्ये विजय मिळाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील कोहली चौथा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथने आपल्या संघाला सर्वाधिक (53) विजय मिळवून दिले. त्यानंतर रिकी पाँटिगने (48), स्टीव्ह स्मिथने (41) आणि त्यानंतर कोहली चौथ्या नंबरवर आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 58.82 आहे.

कसोटी कर्णधार म्हणून 5,864 धावा भारताचा कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा विराटच्या नावावर आहेत. 68 कसोटी सामन्यात विराटने कॅप्टन म्हणून 5,864 धावा केल्या.

(Virat Kohli steps down after unprecedented heights as Test captain 40 wins in 68 matches)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.