AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : टीम इंडियाची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने धुव्वा, मालिकेत 1-0 ने आघाडी

Australia A Women vs India A Women Match Result : वूमन्स इंडिया ए टीमने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर सहज विजय साकारला आणि मलिकेत 1-0 ने आघाडी मिळवली.

AUS vs IND : टीम इंडियाची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने धुव्वा, मालिकेत 1-0 ने आघाडी
wind a vs waus a 1st one day match resultImage Credit source: TV9
| Updated on: Aug 13, 2025 | 7:10 PM
Share

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स इंडिया ए टीमने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. ऑस्ट्रेलिया वूमन्स ए टीमने भारताला टी 20i मालिकेत 3-0 अशा फरकाने पराभूत करत क्लिन स्वीप केलं. मात्र त्यानंतर भारताने 13 ऑगस्टला कांगारुंवर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे ब्रिस्बेनमध्ये करण्यात आलं होतं.

ऑस्ट्रेलियाने भारताला 215 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने राधा यादव हीच्या नेतृत्वात हे आव्हान 48 चेंडूंआधी 3 विकेट्स राखून सहज पूर्ण केलं. भारताने 42 ओव्हरमध्ये 5.12 च्या रनरेटने 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. भारताच्या विजयात यास्तिका भाटीया हीने प्रमुख भूमिका बजावली. यास्तिकाने अर्धशतकी खेळी केली. तसेच शफाली वर्मा, धारा गुज्जर, राघबी बिष्ट आणि कर्णधार राधा यादव चौघींनीही योगदान दिलं.

इंडिया ए टीमची बॅटिंग

यास्तिका भाटीया आणि शफाली वर्मा या जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. या जोडीने 77 धावांची सलामी भागीदारी केली. भारताने शफालीच्या रुपात पहिली विकेट गमावली. शफालीने 31 बॉलमध्ये 5 फोरसह 36 रन्स केल्या. त्यानंतर धारा गुजर आणि यास्तिका भाटीया या जोडीनेही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघींनी 78 बॉलमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने भारताच्या विजयाचा दावा आणखी मजबूत केला.

धारा गुजर 31 धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताने यास्तिका भाटीयाच्या रुपात तिसरी विकेट गमावली. यास्तिका भाटीया हीने 70 बॉलमध्ये 7 फोरसह 59 रन्स केल्या. राघवी बिष्ठने 25 तर राधा यादव हीने 19 धावांचं योगदान दिलं. तसेच इतरांनीही धावा करत भारताला विजयापर्यंत पोहचवलं.

पहिल्या डावात काय झालं?

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने कांगारुंना 47.5 ओव्हरमध्ये 214 रन्सवर गुंडाळलं.

ऑस्ट्रेलियासाठी अनिका लिरॉयड आणि राहेल ट्रेनामन या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. अनिकाने 90 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. तर राहेल ट्रेनामन हीने 51 धावांचं योगदान दिलं. मात्र भारतीय गोलंदाजांनी इतरांना झटपट गुंडाळल्याने ऑस्ट्रेलियाला 220 पारही पोहचता आलं नाही. इंडिया एसाठी कॅप्टन राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तितास साधू आणि मिन्नू मणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर शबमन एमडी शकील आणि तनुश्री सरकार या दोघीनी 1-1 विकेट मिळवली.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.