IND vs SL: गौतम गंभीरसोबत गॉलमध्ये काय घडलं होतं? प्रशिक्षक म्हणून आता आव्हान पेलणार का?

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. गॉल कसोटी सामना गौतम गंभीरसाठीही आव्हान असणार आहे. खेळाडू म्हणून त्याने हे मैदान गाजवलं होतं, पण दुसऱ्यांदा कमावलं ते सर्व गमावलं होतं. आता संघाकडून तशा कामगिरीची अपेक्षा आहे.

IND vs SL: गौतम गंभीरसोबत गॉलमध्ये काय घडलं होतं? प्रशिक्षक म्हणून आता आव्हान पेलणार का?
IND vs SL: गौतम गंभीरसोबत गॉलमध्ये काय घडलं होतं? प्रशिक्षक म्हणून आता आव्हान पेलणार का?
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 11, 2026 | 3:17 PM

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा पहिल्या कसोटी सामन्यात कस लागणार आहे. हा कसोटी सामना गॉलमध्ये होणार आहे आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा या मैदानात पाय ठेवणार आहे. हा कसोटी सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून प्रशिक्षक गौतम गंभीरचा कस लागणार आहे. या मैदानात गौतम गंभीर या पूर्वी एक खेळाडू म्हणून उतरला होता. पहिल्यांदा चांगली कामगिरी करून लक्ष वेधलं होतं. त्यानंतरण दोन्ही डावात फेल गेला आणि टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे गौतम गंभीरची जखम पुन्हा एकदा ओली झाली आहे. चला जाणून घेऊयात खेळाडू म्हणून गौतम गंभीरची कामगिरी कशी होती? आणि आता हेड कोच म्हणून काय आव्हानं असणार आहे ते..

गौतम गंभीर, गॉल आणि बरंच काही…

गौतम गंभीर एक खेळाडू म्हणून या मैदानात दोन कसोटी सामने खेळला आहे. पहिल्यांदा 2008 भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आला होता. तेव्हा गौतम गंभीरने श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. पहिल्या डावात गौतम गंभीरने 56 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही 74 धावा काढल्या होत्या. याच सामन्यात वीरेंद्र सेहवागने पहिल्या डावात द्विशतक ठोकलं होतं. त्याने नाबाद 201 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला होती.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारतीय संघ 2010 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर होता. याच मैदानात 18 जुलै 2010 रोजी कसोटी सामना पार पडला होता. तेव्हा श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 520 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव 276 धावांवर आटोपला होता. या डावात गौतम गंभीर फक्त 2 धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात गौतम गंभीरला खातंही खोलता आलं नव्हतं. दोन्ही डावात मलिंगाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला होता. हा सामना श्रीलंकेने 10 विकेटने जिंकला होता.

हेच कोच म्हणून गौतम गंभीरसमोर काय आव्हान?

भारतीय संघ गेल्या काही वर्षात फिरकीचा सामना करण्यात अकार्यक्षम ठरला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिका त्याचं उत्तम उदाहरण आहे. या दोन्ही कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजी भारतीय संघावर भारी पडली. आता गॉल मैदान देखील फिरकीला मदत करणारं आहे. त्यामुळे भारतीय संघ फिरकीचा सामना करेल का? असा प्रश्न आहे. त्यात भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची उणीव प्रकर्षाने दिसणार आहे. काही खेळाडू बरीच वर्षे खेळत आहेत. पण त्या जबाबदारी सामना जिंकवण्याची क्षमता मात्र थोडी कमीच दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us