AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat vs Gambhir IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील मैत्री दुश्मनीमध्ये कधी बदलली? नेमकं काय झालेलं?

Virat vs Gambhir IPL 2023 : दोघे दिल्लीचेच पण मैत्री शत्रुत्वामध्ये बदलायला एक प्रसंग कारणीभूत आहे. दोघे एकत्र टीम इंडियातून खेळले आहेत. मग दोघांमध्ये बिनसलं कशावरुन? मैत्री दुश्मनीमध्ये कशी बदलली?

Virat vs Gambhir IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील मैत्री दुश्मनीमध्ये कधी बदलली? नेमकं काय झालेलं?
ipl 2023 virat kohli-Gautam GambhirImage Credit source: twitter
| Updated on: May 02, 2023 | 1:48 PM
Share

लखनौ : टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये काल मोठा वाद झाला. दोघांमधील जाहीर भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये काल लखनौमध्ये सामना झाला. ही मॅच संपल्यानंतर सर्व वाद उफाळून आला. या भांडणाची स्क्रिप्ट आधीच सामना सुरु असताना लिहिली गेली होती. त्यावेळी विराट कोहली आणि लखनौच्या खेळाडूंमध्ये मैदानावर वादावादीचे प्रसंग घडले होते.

यंदाच्या सीजनमध्ये लखनौ आणि बँगलोरच्या टीममध्ये झालेला पहिला सामना लखनौने जिंकला होता. त्यावेळी लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरने मैदानात येऊन चूप रहाण्याचा इशारा करुन बँगलोरच्या फॅन्सना डिवचलं होतं.

दोघे पण दिल्लीचेच आहेत

त्यामुळे सीजनमधील दुसरा सामना खेळताना, दोन्ही टीम्समधील वातारवण चार्ज असणं स्वाभाविक होतं. त्याचे पडसाद सुद्धा कालच्या सामन्यात पहायला मिळाले. खरंतर वाद घालणारे विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे दिल्लीचे आहेत. एका राज्याच्या टीममधून खेळलेल्या प्लेयर्समध्ये चांगली मैत्रीची भावना असते. महत्वाचं म्हणजे दोघे एकत्र टीम इंडियातून खेळले आहेत. मग दोघांमध्ये बिनसलं कशावरुन? मैत्री दुश्मनीमध्ये कशी बदलली? असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे.

त्यावेळी दोघे चांगले मित्र होते

कोलकात्यात 2009 साली श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीने (107) शतकी खेळी साकारली. ते विराटच वनडेमधील पहिलं शतक होतं. त्या मॅचमध्ये गौतम गंभीरने नाबाद 150 धावा केल्या होत्या. गौतम गंभीरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला. त्यावेळी विराट आणि गौतम गंभीर परस्परांचे चांगले मित्र होते. दोघांच्या मनात परस्परांबद्दल सन्मान होता.

तेव्हा, संबंध बिघडले ते कायमचेच

पण IPL 2013 मध्ये एका मॅचनंतर हे सर्वकाही संपलं. त्यावेळी कालच्या सारख्याच हजारो लोकांसमोर हे खेळा़डू परस्परांशी भिडले होते. विराट कोहली त्या मॅचमध्ये आऊट झाल्यानंतर शिवी देत चालला होता. गंभीरने त्यावेळी विराटला, शिवी का दिली? या बद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी सर्व काही कॅमेऱ्यात कैद झालं. या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंमधील संबंध बिघडले ते कायमचेच. आता वेळोवेळी मनातील ती शत्रुत्वाची भावना दिसून येते. गौतम गंभीर अनेकदा कार्यक्रमामध्ये बोलताना विराट कोहलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. विराटवर टीका करताना दिसतो. काल झालेल्या वादावादीला या सगळ्यीच सुद्धा किनार आहे.

Follow Us
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा.
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.