Narendra Modi Video : नरेंद्र मोदींची तडकाफडकी सर्वात मोठी घोषणा, नव्या इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हणाले, आता देशात….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जेन झींना संबोधित करण्यासाठी करत इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. आता पुन्हा एकदा मोदी यांनी एक व्हिडीओ अपलोड केला असून देशातील तरुणाईला संबोधित केले आहे. शिक्षण व्यवस्था आणि परीक्षेच्या आयोजनात नेमके काय काय बदल केले जातील, याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

Narendra Modi Instagram Video : नीट पेपरफुटीमुळे देशात मोठा वाद उफाळल्याने शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, यासाठी कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने मोठे आंदोलन छेडले होते. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन नंतर जेन झीने हातात घेतले होते. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जेन झींना संबोधित करण्यासाठी करत इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. आता पुन्हा एकदा मोदी यांनी एक व्हिडीओ अपलोड केला असून देशातील तरुणाईला संबोधित केले आहे. शिक्षण व्यवस्था आणि परीक्षेच्या आयोजनात नेमके काय काय बदल केले जातील, याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.
मोदी यांच्या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?
मोदी यांनी देशातील तरुणांना, पालकांना संबोधित केले आहे. “विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भारत सरकार वेगवेगळे पाऊल उचलत आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला ते आज तुरुंगात आहेत. नीट पेपरफुटीचा खटला निकाली काढण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालयाची स्थापना केलेली आहे. आम्ही उद्या संसदेतही कठोर नवा कायदा करणार आहोत. त्यासाठी आम्ही पाऊल उचलले आहे. आपल्याला आता भविष्याचा विचार करायचा आहे,” असे मोदी या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
नंदन निलकेनी यांच्या नेतृत्त्वात हाय पॉरव टास्क फोर्स
तसेच, आपल्या परीक्षा पद्धती या विश्वासार्ह, पारदर्शक असल्या पाहिजेत. आपल्या परीक्षांच्या आयोजनात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे, असे म्हणत तंत्रज्ञान क्षेत्रात जगप्रसिद्ध असणाऱ्या नंदन निलकेनी यांच्या नेतृत्त्वात हाय पॉरव टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी घोषणाही त्यांनी केली.
View this post on Instagram
सरकारला आता संसदेत….
दरम्यान, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आता संसदेतही चर्चा होणार आहे. या चर्चेदरम्यान विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना थोपवण्याची तयारी केली आहे. परीक्षेतील घोटाळे कसे रोखता येतील, याचेही नियोजन सरकारला आता संसदेत सांगावे लागणार आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
