AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup टीममध्ये ‘या’ खेळाडूला न घेतल्यामुळे सिक्सर किंग भडकला; म्हणाला, ‘तो संघात हवा होता’!

माजी खेळाडू युवराज सिंहने निवड समितीवर ताशेरे ओढताना दोन खेळाडूंची नाव घेत त्यांना अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचं सांगतिलं आहे. युवराज सिंह याच्या मते त्यातील एका खेळाडूला संघात जागा द्यायला हवी होती.

World Cup टीममध्ये 'या' खेळाडूला न घेतल्यामुळे सिक्सर किंग भडकला; म्हणाला, 'तो संघात हवा होता'!
वर्ल्ड कपमध्ये 300 पेक्षा जास्त धावा आणि 15 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा युवराज सिंह एकमेव आहे. वर्ल्ड कप इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे.
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 30, 2023 | 5:10 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी निवडलेल्या संघावर भारताचा स्टार आणि माजी खेळाडू युवराज सिंह याने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघामध्ये एका खेळाडूला संधी न दिल्यामुळे युवराजने त्याचं जाहीरपणे नाव घेतलं आहे. निवड समितीवर ताशेरे ओढताना युवराजने एक नाहीतर दोन खेळाडूंना अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवराज सिंह याच्या मते संघामध्ये त्या खेळाडूंना जागा द्यायला हवी होती.

कोण आहेत ते खेळाडू?

भारतीय संघाचा स्टार ऑल राऊंडर अक्षर पटेल दुखापत झाल्याने त्याच्या जागी संघात आर. अश्विन याला घेण्यात आलं. मात्र निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर युवराज सिंह काही खूश दिसला नाही. युवराज सिंहच्या मते अक्षर जखमी झाला तर त्याच्या जागी युजवेंद्र चहल याला संधी मिळायला हवी होती नाहीतर वॉशिंग्टन सुंदरला संघात घ्यायला हवं होतं. मात्र निवड समितीने अश्विनला वर्ल्ड कप संघात स्थान मिळवून दिलं.

काय म्हणाला युवराज सिंह?

माझं वैयक्तित मत आहे की, संघात युजवेंद्र चहल याची गरज आहे कारण लेग स्पिनरची कमी तो भरून काढेल. बर तुम्ही युझीची निवड नाही केलीत तर त्या जागी मी अश्विनला पाहण्यास उत्सुक होतो. बहुतेक संघाला एक अनुभवी स्पिनर हवा होता त्यामुळे आर अश्निन याची वर्ल्ड कप संघात निवड केली असू शकते, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. यावेळी बोलताना युवराज सिंहने जसप्रीत बुमराहबाबतही वक्तव्य केलं आहे.

2011 साली भारताकडे झहीर खान होतो तसा आता संघात जसप्रीत बुमराहसारखा मॅचनविनर आहे. बमुराहसारख्या बॉलरमुळे संघातील इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. दुखापत झाल्यावर कमबॅक करणं अवघड असतं मात्र जसप्रीतने दमदार कमबॅक केल्याचं युवराज सिंह म्हणाला.

भारताचा वर्ल्ड कपसाठी संघ :-

भारत : रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?