AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup टीममध्ये ‘या’ खेळाडूला न घेतल्यामुळे सिक्सर किंग भडकला; म्हणाला, ‘तो संघात हवा होता’!

माजी खेळाडू युवराज सिंहने निवड समितीवर ताशेरे ओढताना दोन खेळाडूंची नाव घेत त्यांना अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचं सांगतिलं आहे. युवराज सिंह याच्या मते त्यातील एका खेळाडूला संघात जागा द्यायला हवी होती.

World Cup टीममध्ये 'या' खेळाडूला न घेतल्यामुळे सिक्सर किंग भडकला; म्हणाला, 'तो संघात हवा होता'!
वर्ल्ड कपमध्ये 300 पेक्षा जास्त धावा आणि 15 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा युवराज सिंह एकमेव आहे. वर्ल्ड कप इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे.
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 30, 2023 | 5:10 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी निवडलेल्या संघावर भारताचा स्टार आणि माजी खेळाडू युवराज सिंह याने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघामध्ये एका खेळाडूला संधी न दिल्यामुळे युवराजने त्याचं जाहीरपणे नाव घेतलं आहे. निवड समितीवर ताशेरे ओढताना युवराजने एक नाहीतर दोन खेळाडूंना अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवराज सिंह याच्या मते संघामध्ये त्या खेळाडूंना जागा द्यायला हवी होती.

कोण आहेत ते खेळाडू?

भारतीय संघाचा स्टार ऑल राऊंडर अक्षर पटेल दुखापत झाल्याने त्याच्या जागी संघात आर. अश्विन याला घेण्यात आलं. मात्र निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर युवराज सिंह काही खूश दिसला नाही. युवराज सिंहच्या मते अक्षर जखमी झाला तर त्याच्या जागी युजवेंद्र चहल याला संधी मिळायला हवी होती नाहीतर वॉशिंग्टन सुंदरला संघात घ्यायला हवं होतं. मात्र निवड समितीने अश्विनला वर्ल्ड कप संघात स्थान मिळवून दिलं.

काय म्हणाला युवराज सिंह?

माझं वैयक्तित मत आहे की, संघात युजवेंद्र चहल याची गरज आहे कारण लेग स्पिनरची कमी तो भरून काढेल. बर तुम्ही युझीची निवड नाही केलीत तर त्या जागी मी अश्विनला पाहण्यास उत्सुक होतो. बहुतेक संघाला एक अनुभवी स्पिनर हवा होता त्यामुळे आर अश्निन याची वर्ल्ड कप संघात निवड केली असू शकते, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. यावेळी बोलताना युवराज सिंहने जसप्रीत बुमराहबाबतही वक्तव्य केलं आहे.

2011 साली भारताकडे झहीर खान होतो तसा आता संघात जसप्रीत बुमराहसारखा मॅचनविनर आहे. बमुराहसारख्या बॉलरमुळे संघातील इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. दुखापत झाल्यावर कमबॅक करणं अवघड असतं मात्र जसप्रीतने दमदार कमबॅक केल्याचं युवराज सिंह म्हणाला.

भारताचा वर्ल्ड कपसाठी संघ :-

भारत : रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल