AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup टीममध्ये ‘या’ खेळाडूला न घेतल्यामुळे सिक्सर किंग भडकला; म्हणाला, ‘तो संघात हवा होता’!

माजी खेळाडू युवराज सिंहने निवड समितीवर ताशेरे ओढताना दोन खेळाडूंची नाव घेत त्यांना अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचं सांगतिलं आहे. युवराज सिंह याच्या मते त्यातील एका खेळाडूला संघात जागा द्यायला हवी होती.

World Cup टीममध्ये 'या' खेळाडूला न घेतल्यामुळे सिक्सर किंग भडकला; म्हणाला, 'तो संघात हवा होता'!
वर्ल्ड कपमध्ये 300 पेक्षा जास्त धावा आणि 15 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा युवराज सिंह एकमेव आहे. वर्ल्ड कप इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू आहे.
| Updated on: Sep 30, 2023 | 5:10 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 साठी निवडलेल्या संघावर भारताचा स्टार आणि माजी खेळाडू युवराज सिंह याने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघामध्ये एका खेळाडूला संधी न दिल्यामुळे युवराजने त्याचं जाहीरपणे नाव घेतलं आहे. निवड समितीवर ताशेरे ओढताना युवराजने एक नाहीतर दोन खेळाडूंना अनेकवेळा दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवराज सिंह याच्या मते संघामध्ये त्या खेळाडूंना जागा द्यायला हवी होती.

कोण आहेत ते खेळाडू?

भारतीय संघाचा स्टार ऑल राऊंडर अक्षर पटेल दुखापत झाल्याने त्याच्या जागी संघात आर. अश्विन याला घेण्यात आलं. मात्र निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर युवराज सिंह काही खूश दिसला नाही. युवराज सिंहच्या मते अक्षर जखमी झाला तर त्याच्या जागी युजवेंद्र चहल याला संधी मिळायला हवी होती नाहीतर वॉशिंग्टन सुंदरला संघात घ्यायला हवं होतं. मात्र निवड समितीने अश्विनला वर्ल्ड कप संघात स्थान मिळवून दिलं.

काय म्हणाला युवराज सिंह?

माझं वैयक्तित मत आहे की, संघात युजवेंद्र चहल याची गरज आहे कारण लेग स्पिनरची कमी तो भरून काढेल. बर तुम्ही युझीची निवड नाही केलीत तर त्या जागी मी अश्विनला पाहण्यास उत्सुक होतो. बहुतेक संघाला एक अनुभवी स्पिनर हवा होता त्यामुळे आर अश्निन याची वर्ल्ड कप संघात निवड केली असू शकते, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. यावेळी बोलताना युवराज सिंहने जसप्रीत बुमराहबाबतही वक्तव्य केलं आहे.

2011 साली भारताकडे झहीर खान होतो तसा आता संघात जसप्रीत बुमराहसारखा मॅचनविनर आहे. बमुराहसारख्या बॉलरमुळे संघातील इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. दुखापत झाल्यावर कमबॅक करणं अवघड असतं मात्र जसप्रीतने दमदार कमबॅक केल्याचं युवराज सिंह म्हणाला.

भारताचा वर्ल्ड कपसाठी संघ :-

भारत : रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....