AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM 3rd T20 : झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 आधी शुबमन गिलची ‘अग्निपरीक्षा’, स्टार खेळाडूला डच्चू?

ind vs zim 3rd t-20 : टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यामधील तिसऱ्या टी-20 सामन्यात टीममध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकतो. टीम इंडियाने दुसरा सामना जिंकत किलर कमबॅक केलं असलं तरीसु्द्धा दोन खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

IND vs ZIM 3rd T20 : झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 आधी शुबमन गिलची 'अग्निपरीक्षा', स्टार खेळाडूला डच्चू?
| Updated on: Jul 10, 2024 | 3:10 PM
Share

टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. यामधील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकत दमदार सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या वाघांनी जोरदार कमबॅक केलं. झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव केला. 20 ओव्हरमध्ये 234 धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या  वेगवान गोलंदाजांनी 134 धावांवर ऑल आऊट केलं होतं. टीम इंडियाने दमदार विजय मिळवूनही तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेचा पराभव केला असला तरी एका खेळाडूला डच्चू मिळण्यासाठी शक्यता आहे.

टीम इंडियामध्ये फार मोठा बदल होण्याची शक्यता म्हणजे संजू सॅमसन हा तिसऱ्या सामन्यामध्ये खेळण्याची शक्यता आहे. मात्र याचा फटका थेट ध्रुव जुरेल याला बसू शकतो. कारण संजूला संघात स्थान दिल्यावर टीम इंडियाच्या प्लेइंग11 मधून जुरेलला बाहेर बसावं लागणार आहे. दुसरा बदल म्हणजे शिवम दुबे याला जर संधी मिळाली रियान पराग प्लेइंग 11 मधून बाहेर असेल. मागील सामन्यात गिलने एक बदल केला होता तो म्हणजे खलील अहमद याला बाहेर केलं होतं. त्याच्या जागी संघात साई सुदर्शन याला घेतलं होतं.

साई सुदर्शन याला संघात घेतलं खरं पण त्याला बॅटींग करण्याची संधी मिळाली नाही. रुतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी झिम्बाब्वेला फोडून काढलं. त्यानंतर रिंकू सिंहने राहिलेली कसर भरून काढली. त्यामुळे येत्या सामन्यांमध्ये हे तीन खेळाडू बदलले जाणार नाहीत. बदल केलाच तर संजू आणि शिवम यांना संघात घेतलं जावू शकतं.

तिसऱ्या टी- 20 साठी संभाव्य टीम इंडिया

शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सस्सामन, रिंकू सिंग, शिवम दुबे, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.