AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: 9 विकेट पडल्यानंतर बांगलादेश टीम कशी जिंकली ? या खेळाडूने विजयी प्लॅन उघड केला

या खेळाडूने विजयी प्लॅन उघड केला

IND vs BAN: 9 विकेट पडल्यानंतर बांगलादेश टीम कशी जिंकली ? या खेळाडूने विजयी प्लॅन उघड केला
mehdi hassan mirajImage Credit source: twitter
| Updated on: Dec 05, 2022 | 9:24 AM
Share

मुंबई: कालची मॅच टीम इंडिया (IND) कधीचं विसरणार नाही अशी होती, असं म्हणायला हरकत नाही. कारण काल झालेल्या मॅचमध्ये बांगलादेशच्या (BAN) शेवटच्या खेळाडूंनी 51 धावांची भागिदारी केली. त्यामुळे बांगलादेश टीमचा विजय झाला. बांगलादेश टीमच्या 9 विकेट पडल्या होत्या, त्यामुळे टीम इंडिया मॅच जिंकेल अशी स्थिती असताना, बांगलादेश टीमचा मेहदी हसन मिराज (mehdi hassan miraj) आणि मुस्ताफिजुर रहमान या जोडीने 51 धावांची भागीदारी केली आणि टीमला विजय मिळवून दिला.

काल झालेल्या रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे पुढची मॅच टीम इंडियाला जिंकावीचं लागणार आहे. कारण पुढची मॅच टीम इंडिया जिंकली तर मालिकेत बरोबरी होणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी पुढची मॅच अधिक महत्त्वाची आहे. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेक चुका देखील केल्या आहेत.

मेहदी हसन म्हणतो की, “अल्लाह ची कृपा आहे, मी वर्तमान काळात खुष आणि उत्साहित आहे. मुस्ताफिजुर आणि मला एका विश्वासाची गरज होती. मी फक्त मुस्ताफिजुर 20 चेंडू शांत पद्धतीने खेळण्यास सांगितलं होतं. मी फक्त एका क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करुन धावा कशा करता येतील याचा विचार करीत होतो.”

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....