AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsENG : इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला, भारताचा 31 धावांनी पराभव

इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकात 306 धावा केल्या.

INDvsENG : इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला, भारताचा 31 धावांनी पराभव
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 01, 2019 | 11:12 AM
Share

लंडन : विश्वचषकात करो या मरो अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडने टीम इंडियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत, विश्वचषकातील आव्हान कायम ठेवलं आहे. भारताचा यंदाच्या विश्वचषकातील पहिला पराभव आहे.  इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला पेललं नाही. भारताला इंग्लंडने 50 षटकात 5 बाद 306 धावात रोखलं. भारताकडून रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकलं, मात्र त्याच्या शतकाला विजयाचा टिळा लागला नाही.  दरम्यान हा सामना जिंकल्यामुळे इंग्लंडचे उपांत्य फेरीचे स्थान निश्चित झाले आहे, त्यामुळे पाकिस्तानची मात्र धाकधूक वाढली आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एजबस्टन मैदानावर आज (30 जून) भारत विरुद्ध इंग्लंड सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने विजय शंकर ऐवजी ऋषभ पंतला संधी दिली. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअस्ट्रो यांनी 160 धावांची दमदार सलामी दिली. रॉयने 66 तर बेअस्ट्रोने 111 धावा ठोकल्या. त्यामुळे इंग्लंडला 337 धावांचा डोंगर उभा करता आला.

इंग्लंडने दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल मैदानात उतरले. मात्र दुसऱ्या षटकात लोकेश राहुल शून्यावर बाद झाला आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला. यामुळे टीम इंडियाची सुरुवातच अडखळत झाली. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने सावध पावित्रा घेत, डाव सवरला. भारताने 14 षटकात केवळ 50 इतकीच मजल मारली. त्यामुळे भारताचं रनरेट वाढत गेलं.

या दोघांनी जम बसल्यानंतर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. दोघांनीही अर्धशतकं पूर्ण केल्यानंतर धावगती वाढवणे आवश्यक होतं. मात्र ती म्हणावी तशी वाढली नाही. विराटची शतकी खेळीकडे वाटचाल सुरु असताना प्लंकेटच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि भारताची जमलेली जोडी फुटली.  विराटने 76 चेंडूत 66 धावा केल्या.  रोहित-विराटने दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर रोहितच्या साथीला चौथ्या नंबरवर ऋषभ पंत आला. ऋषभने आडवे तिडवे फटके मारुन 32 धावा केल्या. पंतच्या साथीने रोहितने शतक पूर्ण केलं. मात्र क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला आणि टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या.   रोहित शर्माने 109 चेंडूत 102 धावा केल्या.  यानंतर मग हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतने खेळाची सूत्रे हाती घेतली. मात्र  ऋषभ पंतही 29 चेंडूत 32 धावा करुन माघारी परतला.

यानंतर हार्दिक पंड्याने धोनीच्या साथीने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही यश आलं नाही. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने, धोनी, पंड्या, केदार जाधव यांना मोठे फटकेच मारता आले नाहीत.

पंड्याने 33 चेंडूत 45 धावांची खेळी केली. तर धोनी 31 चेंडूत 42 धावा करुन नाबाद राहिला.  केदार जाधवने 12 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या.

त्याआधी इंग्लंडने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी 13 षटकार आणि 27 चौकारांची दमदार खेळी केली. यामुळे टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान मागील दोन सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेणाऱ्या शमीने इंग्लंड विरुद्धच्या सामान्यातही भेदक गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या.  कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आलं.

सलामीवीर जॉनी बेअरस्टोच्या 10 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर यजमान इंग्लंडने 337 धावा ठोकल्या. बेअरस्टोसोबतच जेसन रॉय 66, बेन स्टोक्स 79 आणि जो रुट 44 धावा केल्या.

LIVE UPDATE

[svt-event title=”भारताला पाचवा झटका, हार्दिक पांड्या 45 धावा करत माघारी” date=”30/06/2019,10:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला चौथा झटका, ऋषभ पंत 32 धावा करत माघारी” date=”30/06/2019,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला तिसरा झटका, शतकी खेळी करणारा सलामीवीर रोहित शर्मा बाद” date=”30/06/2019,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी ” date=”30/06/2019,10:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताला दुसरा झटका, कर्णधार विराट कोहली 66 धावांवर बाद” date=”30/06/2019,9:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीसोबत भारताच्या रडत रडत 100 धावा पूर्ण” date=”30/06/2019,8:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारताच्या 10 षटकांत 1 बाद, 28 धावा” date=”30/06/2019,7:58PM” class=”svt-cd-green” ] इंग्लंडच्या गोलंदाजांना भेदक गोलंदाजीचा पाठलाग करताना टीम इंडियाचा पार धुव्वा उडाला आहे. भारताने 10 षटकात अवघ्या 28 धावा केल्या आहेत, तर टीम इंडियाचा सलामीवीर के.एल.राहुल शून्यावर बाद झाला  [/svt-event]

[svt-event title=”भारताला पहिला झटका, सलामीवीर लोकेश राहुल बाद” date=”30/06/2019,7:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Follow Us
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!