IND vs AFG: ‘सरपंचसाहब’ मानलं तुम्हाला, मालिका जिंकल्यानंतर सर्वांची मनंही जिंकली, एका कृतीची सर्वत्र चर्चा
Shreyas Iyer: भारत आणि अफगाणिस्तान टी-२० मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. पण या नंतर कर्णधार श्रेयस अय्यरने जे केले त्याच्या कृतीचे मात्र सर्वत्र कौतुक झाले.

अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका जिंकल्यानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मने जिंकली.
भारताने तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकून अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला. मात्र, मालिका जिंकल्यानंतर जेव्हा भारतीय कर्णधाराला ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तेव्हा त्याने विरोधी संघाचा कर्णधार इब्राहिम झद्रान यालाही सोबत बोलावले आणि दोन्ही कर्णधारांनी एकत्र ट्रॉफी स्वीकारली.
यानंतर इब्राहिम झद्रानने ट्रॉफीसोबत टीम इंडियासोबत एक फोटो काढला. श्रेयसच्या या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक केले. ही मालिका भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील चांगले संबंध दर्शवते.
ही मालिका भारतात आयोजित करण्यात आली होती, परंतु अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड अधिकृत यजमान होता. भारतीय संघ आपल्याच देशात पाहुणे म्हणून खेळत होता.
या मालिकेसाठी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून मैदान भाड्याने घेतले होते, परंतु दिल्ली क्रिकेट बोर्डाने कोणतेही भाडे आकारले नाही. मैत्रीपूर्ण संबंधांच्या आधारावर, सर्व सुविधा विनामूल्य पुरवण्यात आल्या.