Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन, अनेक जिल्ह्यात बरसला
Maharashtra News LIVE : या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाने काही जिल्ह्यात हजेरी लावली आता 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान पुन्हा सांगावा धाडला आहे. या काळात राज्यात दमदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजही काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
वाळवा तालुक्यात पावसाची दडी, भात पीक धोक्यात
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. विशेषतः वाळवा तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने भात पिकाला मोठा फटका बसला असून, परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, एका शेतकऱ्याने नाईलाजाने आपल्या शेतातील भात पिकावर अक्षरशः नांगर फिरवला आहे.
-
उमरग्यात वनरक्षकावर शाईफेक; ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
उमरगा येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात वनरक्षक काका बापूराव मगर यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेच्या तीन कार्यकर्त्यांवर उमरगा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोपवाटिका, घनवन, रस्त्यालगत वृक्षलागवड तसेच विविध वनीकरणाच्या कामांमध्ये बोगस मजुरांची नावे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता.या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई झाली नसल्याचा आरोप करत कार्यालयीन वेळेत वनरक्षक मगर यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली होती
-
-
डिंबे-माणिकडोह बोगदा प्रकल्पाला मंजुरीनंतर आमदार दिलीप वळसे पाटलांकडून विरोध
अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यात पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बोगद्याला विरोध करत मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्प स्थगितीची मागणी केली आहे.वळसे पाटलांचा विरोध म्हणजे संकुचित दृष्टिकोन अशी टीका ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी केली आहे.
-
लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस
लातूर जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आहे, बऱ्याच दिवसांच्या खंडा नंतर लातूर शहर आणि ग्रामीण भागात मोठा पाऊस झाला आहे. मध्यरात्री नंतर पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. वातावरणात कमालीची उष्णता वाढली होती. या पावसामुळे वातावरण सामान्य व्हायला मदत होणार आहे. वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यातल्या अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
-
हिंगोलीत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
हिंगोली जिल्ह्यात पावणे दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली. हाता तोंडाशी आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातचे गेल्या नंतर हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली. मूग ,उडीद ,सोयाबीन सोडून इतर खरीपाच्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला.
-
या आठवड्याच्या सुरूवातीला काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पण दमदार पाऊस झाला नाही, आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान पुन्हा सांगावा धाडला आहे. या काळात गोव्यासह राज्यात दमदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकरी, जनावरांना दिलासा मिळेल. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. काल आणि आज काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राज्यात गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. अनेक मंडळांनी आकर्षक सजावट केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कार्यक्रमानंतर काल गुजरातमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या सुरू असलेल्या सुनावणीबाबत आणि निधी वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेयाची खात्रीलायक सुत्रांनी ही माहिती दिली. काळजी करू नका असा सल्लाही अमित शाह यांनी दिल्याचे समजते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देऊन उपोषण सोडले. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तर आदित्य ठाकरे यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून, टीव्ही आणि सोशल मीडिया ट्रायल्स थांबवून CBI ला निःपक्षपातीपणे तपास करू देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यावर ५०० कोटींची बदनामीची नोटीस बजावल्याचे समोर आले आहे.
Published On - Sep 18,2026 7:57 AM
