AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020: विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल

आयपीएलच्या अंतिम सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

IPL 2020: विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 11, 2020 | 12:35 AM
Share

दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या (Hitman Rohit Sharma) धमाकेदार खेळीच्या जोरावर आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) नाबाद 33 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा आयपीएलंच विजेतेपद पटकावलं आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. ईशान किशनने नाबाद 33 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (IPL 2020 Final : champions won 20 crores prize money)

आयपीएलमधील या विजयासह मुंबई इंडियन्स संघाने पाचव्यांदा आयपीएल चषकावर स्वतःचं नाव कोरलं. अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. या विजयामुळे आयपीएलकडून विजेत्या मुंबईच्या संघाला आयपीएलच चषक आणि 20 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. तसेच उपविजेत्या दिल्लीच्या संघाला 12.5 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांना (सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) 8 कोटींहून अधिक रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे.

दरम्यान, सुरुवातीला असे सांगण्यात आले होते की, विजेत्या, उपविजेत्या आणि तिसऱ्या-चौथ्या स्थानावार असणाऱ्या संघांना देण्यात येणाऱ्या रक्कमेत 50 टक्के कपात केली जाणार आहे. IPL 2019 मध्ये विजेत्या संघाला 20 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाने विजेतेपद पटकावलं होतं. यंदा आयपीएलच्या बक्षीसाच्या रक्कमेत 50 टक्के कपात करुन विजेत्या संघाला 10 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु सामना संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे 20 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच गेल्या वर्षी उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले होते, तर यंदा उपविजेत्या संघाला 6.25 कोटी रुपये दिले जाणार आहेत, असे सांगण्यात आले होते. परंतु पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे 12.5 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या खेळाडूंचा यंदाच्या आयपीएलमध्ये जलवा

1. इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर (प्रभावशाली युवा खेळाडू) : देवदत्त पडिक्कल (RCB) : 10 लाख रुपये बक्षीस 2. गेमचेंजर ऑफ द इयर : के. एल. राहुल (KXIP) :10 लाख रुपये बक्षीस 3. सुपर स्ट्रायकर ऑफ द इयर : कायरन पोलार्ड (MI) : 10 लाख रुपये बक्षीस 4. मोस्ट सिक्सेस ऑफ द सिजन : ईशान किशन (MI) : 10 लाख रुपये बक्षीस 5. पॉवर प्लेअर अवॉर्ड : ट्रेन्ट बोल्ट (MI) : 10 लाख रुपये बक्षीस 6. पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज) : कगिसो रबाडा : 10 लाख रुपये बक्षीस 7. ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा फलंदाज) : के. एल. राहुल : 10 लाख रुपये बक्षीस 8. मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर : जोफ्रा आर्चर (RR) : 10 लाख रुपये बक्षीस 9. फेअर प्ले अवॉर्ड : मुंबई इंडियन्स

संबंधित बातम्या

IPL 2020 Final : स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत ट्रेन्ट बोल्टने रचला इतिहास

IPL 2020 Final, MI vs DC : ऑरेंज कॅप मिळवण्याची ‘गब्बर’ संधी हुकली, केएल राहुलला ऑरेंज कॅपचा मान

IPL 2020 Final, MI vs DC : कमी टार्गेट, पॉवरप्लेमध्ये बहारदार सुरुवात ते अनुभवी खेळाडूंची फौज, मुंबईच्या विजयाची पाच कारणे

(IPL 2020 Final : champions won 20 crores prize money)

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा