Vaibhav Sooryavanshi: जर त्याला संघात टिकायचे असेल तर… इशान किशनची वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग? विधानाची जोरदार चर्चा

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु असून काल दुसरा सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. यानंतर इशान किशनने एक विधान केले त्याची मात्र जोरदार चर्चा रंगली आहे.

Vaibhav Sooryavanshi: जर त्याला संघात टिकायचे असेल तर... इशान किशनची वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग? विधानाची जोरदार चर्चा
| Updated on: Jul 26, 2026 | 8:40 AM

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत तीन सामने आहेत त्यातील दोन सामने पार पाडले. दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले. यामुळे आता भारतीय संघाने ही मालिकाही जिंकलीच आहे. भारतीय संघाचे मागील काही टी-20 सामन्यातील प्रदर्शन पाहता ही मालिका भारतीय संघासाठी चांगली ठरती के नाही असा प्रश्नचिन्ह होताच, पण आता तसं झाले नाही. श्रेयस अय्यर आपल्या नेतृत्वात पहिली टी-20 मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यातील विजयानंतर इशान किश माध्यमांसमोर आला. इशानने यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली पण एका प्रश्नाची जास्त चर्चा रंगली. इशानने वैभवबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन म्हणतो की, “अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक फलंदाजीबद्दलच्या चर्चांची मला पर्वा नाही, कारण तो केवळ आपली भूमिका बजावण्यावर आणि संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करतो.” शनिवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या तीन षटकांतच भारताने अभिषेक शर्मा (08) आणि वैभव सूर्यवंशी (20) यांना गमावले, त्यामुळे धावसंख्या 29 धावांवर दोन गडी बाद अशी झाली. त्यानंतर किशनने 44 चेंडूंमध्ये 81 धावांची शानदार खेळी करून संघाला 219 धावांपर्यंत पोहोचवले.

या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 90 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. दोन्ही संघांमधील अंतिम सामना रविवारी खेळला जाईल. “बाहेर काय चालले आहे याकडे मी फारसे लक्ष देत नाही, मला फलंदाजी कशी करायची हे माहित आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानात राहणे. कोण जास्त धावा करत आहे किंवा जास्त षटकार आणि चौकार मारत आहे याची चिंता करू नका. जेव्हा सुरुवातीलाच विकेट लवकर पडतात, तेव्हा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची जबाबदारी वाढते, प्रत्येक खेळाडूची स्वतःची ओळख असू शकते, पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, जेव्हा संघाच्या दोन विकेट लवकर पडतात तेव्हा काय करायचे हे तुम्हाला समजून घ्यावे लागते.”

भारताच्या खराब सुरुवातीनंतर, किशनने हुशारीने डाव सांभाळला. त्याने 31 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर पुढच्या 13 चेंडूंमध्ये 31 धावा जोडून वेगाने धावा केल्या. मिड-विकेटच्या दिशेने मारलेले त्याचे जोरदार फटके हे त्याच्या खेळीचे मुख्य आकर्षण होते. इशान म्हणाला की, “तुम्हाला सातत्यपूर्ण फलंदाजी करायची असते. कधीकधी तुम्हाला संधीचा फायदा घ्यावा लागतो, तर कधीकधी तुम्हाला भागीदारी उभारावी लागते. यासाठी खेळपट्टी आणि सामन्याची परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही मैदानावर असता, तेव्हा तुमच्या आजूबाजूला काय घडत आहे आणि सामन्यातून तुम्हाला काय मिळवायचे आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. कठीण काळात खेळाडूंनी आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत, तेव्हा आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर विचार करत बसण्याऐवजी आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे अधिक चांगले आहे.”

इशन वैभवबद्दल म्हणाला, “वैभव खूप हुशार आहे. त्याला फलंदाजी कशी करायची आणि मैदानावर व मैदानाबाहेर स्वतःला कसे सांभाळायचे हे माहीत आहे.  इतक्या लहान वयात मिळालेल्या लोकप्रियतेनंतरही वैभवने जमिनीवर पाय ठेवून राहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता, तेव्हा कशावर लक्ष केंद्रित करायचे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. मी, अभिषेक, अक्षर भाई आणि संघातील इतर अनेक खेळाडू त्याला सतत सांगतात की, सोशल मीडिया किंवा बाहेरील गोंधळावर नाही, तर क्रिकेटवर लक्ष केंद्रित कर. जर तो क्रीजवर टिकून राहिला, तर तो संघासाठी मोठा फरक घडवू शकतो. जो फलंदाज पहिल्या चेंडूपासून आक्रमकपणे खेळतो, तो संघाला पॉवरप्लेमध्ये 80-90 धावांपर्यंत पोहोचवू शकतो.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us